पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील ८ आरओ प्रकल्पांना (RO Water) महापालिकेकडून पुन्हा सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. नियमभंग केल्याने ही कारवाई केली असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
महापालिकेत समाविष्ट धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नर्हे, आंबेगाव या गावांमध्ये फेब्रुवारीत ‘जीबीएस’ची साथ पसरली होती. ही साथ दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली असल्याचे तपासणीत आढळून आले होते.
या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणीत ३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आल्याने पालिकेने या सर्व प्रकल्पांना सील ठोकले होते. त्यानंतर आरओ प्लॅन्टसाठी केलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्या ८ प्रकल्पांना सील करण्यात आले आहेत.
एका आरओ प्रकल्प चालकाकडून थेट विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा झाली असून, त्याच्यावर ’व्हेटिलेंटर’वर उपचार सुरू आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत केलेल्या पुनतर्पासणीदरम्यान ही कारवाई केली गेली.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…