RO Water : आरओचे सांगून थेट विहिरीतील पाण्याची विक्री

विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा

पुण्यात आठ आरओ प्रकल्पांना पुन्हा ठोकले सील


२७ आरओ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळले


पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील ८ आरओ प्रकल्पांना (RO Water) महापालिकेकडून पुन्हा सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. नियमभंग केल्याने ही कारवाई केली असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.



दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली ‘जीबीएस’ची साथ


महापालिकेत समाविष्ट धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नर्‍हे, आंबेगाव या गावांमध्ये फेब्रुवारीत ‘जीबीएस’ची साथ पसरली होती. ही साथ दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली असल्याचे तपासणीत आढळून आले होते.



३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा


या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणीत ३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आल्याने पालिकेने या सर्व प्रकल्पांना सील ठोकले होते. त्यानंतर आरओ प्लॅन्टसाठी केलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्या ८ प्रकल्पांना सील करण्यात आले आहेत.



विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा

एका आरओ प्रकल्प चालकाकडून थेट विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा झाली असून, त्याच्यावर ’व्हेटिलेंटर’वर उपचार सुरू आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत केलेल्या पुनतर्पासणीदरम्यान ही कारवाई केली गेली.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये