RO Water : आरओचे सांगून थेट विहिरीतील पाण्याची विक्री

  36

विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा

पुण्यात आठ आरओ प्रकल्पांना पुन्हा ठोकले सील


२७ आरओ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळले


पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील ८ आरओ प्रकल्पांना (RO Water) महापालिकेकडून पुन्हा सील ठोकण्याची कारवाई करण्यात आली. नियमभंग केल्याने ही कारवाई केली असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.



दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली ‘जीबीएस’ची साथ


महापालिकेत समाविष्ट धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नर्‍हे, आंबेगाव या गावांमध्ये फेब्रुवारीत ‘जीबीएस’ची साथ पसरली होती. ही साथ दूषित पाणी पुरवठ्यामुळे पसरली असल्याचे तपासणीत आढळून आले होते.



३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा


या भागातील आरओ प्रकल्पांच्या पाण्याची तपासणीत ३० मधील २७ प्रकल्पांतून दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून आल्याने पालिकेने या सर्व प्रकल्पांना सील ठोकले होते. त्यानंतर आरओ प्लॅन्टसाठी केलेल्या नियमावलीचे पालन न केल्याने त्या ८ प्रकल्पांना सील करण्यात आले आहेत.



विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा

एका आरओ प्रकल्प चालकाकडून थेट विहिरीतील पाणी शुद्ध म्हणून पाणी पुरवठा केल्यानंतर एका लहान मुलाला ’जीबीएस’ची बाधा झाली असून, त्याच्यावर ’व्हेटिलेंटर’वर उपचार सुरू आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत केलेल्या पुनतर्पासणीदरम्यान ही कारवाई केली गेली.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, एसटी साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणार...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना