तिकीट कन्फर्म असणाऱ्यांनाच मिळणार प्लॅटफॉर्मवर प्रवेश

देशभरातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नवीन नियम लागू


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्लॅटफॉर्मवरील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाले आहे, त्यांनाच आता रेल्वे स्थानकावर (प्लॅटफॉर्मवर) प्रवेश दिला जाणार आहे. देशभरातील ६० प्रमुख रेल्वे स्थानकांवर हा नवीन नियम लागू केला जाईल. या नियमाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे देखील भारतीय रेल्वेने म्हटले आहे.


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये जास्त पादचाऱ्यांची गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सहमती झाली. बैठकीत जास्त रेल्वे प्रवासींची गर्दी असलेल्या स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनासाठी कार्यक्षम उपाययोजना केल्या पाहिजेत यावर सहमती झाली. या नवीन धोरणाचे उद्दिष्ट विशेषतः गर्दीच्या हंगामात प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात आणणे हा आहे.



विशेषतः सुट्ट्या आणि सणांच्या काळात भारतीय रेल्वे स्थानकांवर सहसा गर्दी असते. बरेच लोक त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी रेल्वे स्थानकांवर येतात आणि यामुळे गर्दी वाढते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दी रोखण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हे धोरण लवकरच लागू केले जाईल. देशातील मोठ्या शहरांमधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर लवकरच हे धोरण लागू केले होईल. या नवीन नियमांमुळे अनपेक्षित गर्दी टाळता येईल आणि प्रवाशांचा प्रवास सुरळीत होईल, असे भारतीय रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.


देशातील ६० मोठ्या रेल्वे स्थानकांवर हा नियम लागू केला जाईल. गर्दी नियंत्रणाच्या गरजेनुसार अतिरिक्त स्थानके यादीत समाविष्ट केली जातील, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.



‘या’ स्थानकांचा समावेश


नवी दिल्ली रेल्वे स्थानक (दिल्ली)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)
हावडा जंक्शन (कोलकाता)
चेन्नई सेंट्रल (चेन्नई)
बंगळुरू सिटी रेल्वे स्थानक (बंगळुरू )

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००