HSC Exam Answer Sheets : कामोठे वसाहतीत रस्त्यावर सापडल्या १२ वीच्या उत्तरपत्रिका

नवी मुंबई  : राज्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच पनवेल महापालिका हद्दीतील कामोठे वसाहतीत १२ वीच्या उत्तरपत्रिकेंचा (HSC Exam Answer Sheets) अख्खा संचच रस्त्यावर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. २८ मार्च रोजी पार पडलेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत. मनसे महिला आघाडीच्या पदाधिकारी स्नेहल बागल यांना हा संच सापडल्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात दिली आहे.



या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागाकडून वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी बोर्डाकडून नियमानुसार संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई विभागाच्या प्रभारी विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली. सापडलेल्या उत्तरपत्रिका मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता कामोठे येथे राहणाऱ्या एका शिक्षकांकडून हे पेपर गहाळ झाले असल्याची माहिती संबंधित शिक्षकाने मुंबई विद्यापीठाला दिली आहे, असे मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.


बारावीच्या बुककीपिंग विषयाची परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी झाली होती. त्याच्या २५ उत्तरपत्रिका कामोठे बस स्टॉपच्या जवळ झाडीत टाकलेल्या आढळल्या. काही कामानिमित्ताने गुरुवारी सकाळी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल कामोठे बस स्टॉपजवळ आल्या असता एक उत्तरपत्रिका त्यांच्या पायाजवळ उडत आली. कुतूहल म्हणून त्यांनी ती पाहिली असता ती बारावीची उत्तरपत्रिका असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांना माहिती दिली.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात