मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे गुरुवारी अयोध्येला रवाना होणार

प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली माहिती


अहिल्यानगर : मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ७५० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन विशेष रेल्वे गुरुवार ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अयोध्येकडे रवाना होणार असून अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक नियोजन करावे असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.


बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार, तहसीलदार शरद घोरपडे आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभा गीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.लाभार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून घ्यावे, नोंदणी करून येण्यास इच्छुक नसलेल्या नागरिकांच्या ऐवजी प्रतीक्षा यादीतील नागरिकांची नावे निश्चित करावी.


लोकप्रतिनिधिना नियोजनात सहभागी करून घ्यावे. लाभार्थ्यांनी आधारकार्ड, दोन छायाचित्रे, आवश्यक औषधे, पाच दिवसाचे आवश्यक साहित्य आणण्याबाबात सूचना द्याव्यात. सकाळी ९ वाजेपर्यंत लाभार्थी अहमदनगर रेल्वे स्थानकावर पोहोचतील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.विशेष रेल्वे ७ तारखेला रात्री अयोध्येला पोहोचणार आहे आणि १० तारखेला सकाळी अहिल्या नगरला परत येईल. प्रवासादरम्यान लाभार्थ्यांची सर्व व्यवस्था आयआरटीसीटीतर्फे करण्यात येणार आहे. रेल्वेत वैद्यकीय उपचारासाठी पथक नियुक्त करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.-

Comments
Add Comment

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी