माणिकराव कोकाटेंना न्यायालयातून दिलासा

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने कोकाटेंला दिलेली शिक्षा स्थगित केली आहे. यामुळे कोकाटेंच्या मंत्रि‍पदावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीची सदनिका मिळवताना शासनाची फसवणूक करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली होती. यामुळे कोकाटेंना मंत्रिपदावरुन हटवावे अशी मागणी विरोधक करत होते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यास मंत्रिपद तसेच आमदारकी रद्द करता येते. हे संकट टाळण्यासाठी कोकाटेंनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दिलासा दिला.



याआधी सोमवार ३ मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक दररोज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. पण विषय कोर्टात आहे आणि निकाल आल्यावर पुढचा निर्णय घेता येईल, अशी भूमिका शासनाने घेतली होती. अखेर आज (बुधवार ५ मार्च २०२५) न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे कोकाटेंच्या मंत्रि‍पदावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी