माणिकराव कोकाटेंना न्यायालयातून दिलासा

मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने कोकाटेंला दिलेली शिक्षा स्थगित केली आहे. यामुळे कोकाटेंच्या मंत्रि‍पदावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीची सदनिका मिळवताना शासनाची फसवणूक करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झाली होती. यामुळे कोकाटेंना मंत्रिपदावरुन हटवावे अशी मागणी विरोधक करत होते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाल्यास मंत्रिपद तसेच आमदारकी रद्द करता येते. हे संकट टाळण्यासाठी कोकाटेंनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दिलासा दिला.



याआधी सोमवार ३ मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक दररोज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. पण विषय कोर्टात आहे आणि निकाल आल्यावर पुढचा निर्णय घेता येईल, अशी भूमिका शासनाने घेतली होती. अखेर आज (बुधवार ५ मार्च २०२५) न्यायालयाचा निर्णय आला आहे. न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे कोकाटेंच्या मंत्रि‍पदावरील टांगती तलवार दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि