वाशिमचा पालकमंत्री बदलणार ? राष्ट्रवादीचे मुश्रीफ राजीनामा देणार ?

  72

मुंबई : धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याला २४ तास होत नाहीत तोच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी सुरू केली आहे. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. यामुळे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत.



हसन मुश्रीफ मंत्री असल्यामुळे वास्तव्यासाठी अमेकदा मुंबईत शासकीय निवासस्थानी अथवा कोल्हापूरमध्ये स्वतःच्या घरी असतात. पण त्यांना पालकमंत्री म्हणून वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांचा वारंवार कोल्हापूर - मुंबई - वाशिम असा सुमारे ८०० किमी. प्रवास होत आहे. वय आणि तब्येतीमुळे वारंवार हा प्रवास करणे झेपत नसल्याची तक्रार करत हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. अजित पवार हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री हे पद सोडू नये यासाठी विनंती करत असल्याचेही वृत्त आहे. पण मुश्रीफ यांनी पद सोडले तर लवकरच वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे.

याआधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुरू झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.