BSNLने केलीये धमाल, आजच घ्या हा प्लान पुढच्या होळीपर्यंत रिचार्जचे नो टेन्शन

मुंबई: जर तुम्ही वारंवार रिचार्जमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी शानदार प्लानची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने एक दीर्घकाळाच्या व्हॅलिडिटीचा प्लान आणला आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केलात तर पुढील वर्षी होळीनंतरही तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंगसह अनेक फायदेही मिळत आहे.



BSNLच्या या रिचार्जमुळे नो टेन्शन


BSNL २३९९ रूपयांच्या या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहे. यात वर्षभरापेक्षा अधिक व्हॅलिडिटी तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जात आहे. हा प्लान आज रिचार्ज केलात तर तुम्हाला पुढील वर्षी मे पर्यंत डेटा, एसएमएस, कॉलिंग आणि व्हॅलिडिटीची चिंता करण्याची गरज नाही. या एकाच प्लानमध्ये कंपनी तुम्हाला छप्परफाड फायदे देत आहे.



BSNLचा २३९९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये ४२५ दिवसांची म्हणजेच १४ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. या १४ महिन्यांदरम्यान कंपनी देशभरात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देत आहे. यासोबतच १४ महिन्यांपर्यंत युजर्स ला दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधा मिळेल. डेटाचेही टेन्शन घेण्याचे गरज नाही. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर कमी स्पीडवरही नेटचा वापर करता येतो.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार