BSNLने केलीये धमाल, आजच घ्या हा प्लान पुढच्या होळीपर्यंत रिचार्जचे नो टेन्शन

मुंबई: जर तुम्ही वारंवार रिचार्जमुळे त्रस्त असाल तर आम्ही तुमच्यासाठी शानदार प्लानची माहिती घेऊन आलो आहोत. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने एक दीर्घकाळाच्या व्हॅलिडिटीचा प्लान आणला आहे. जर तुम्ही हा रिचार्ज केलात तर पुढील वर्षी होळीनंतरही तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. या रिचार्ज प्लानमध्ये कॉलिंगसह अनेक फायदेही मिळत आहे.



BSNLच्या या रिचार्जमुळे नो टेन्शन


BSNL २३९९ रूपयांच्या या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणार आहे. यात वर्षभरापेक्षा अधिक व्हॅलिडिटी तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा ऑफर केला जात आहे. हा प्लान आज रिचार्ज केलात तर तुम्हाला पुढील वर्षी मे पर्यंत डेटा, एसएमएस, कॉलिंग आणि व्हॅलिडिटीची चिंता करण्याची गरज नाही. या एकाच प्लानमध्ये कंपनी तुम्हाला छप्परफाड फायदे देत आहे.



BSNLचा २३९९ रूपयांचा प्लान


या प्लानमध्ये ४२५ दिवसांची म्हणजेच १४ महिन्यांची व्हॅलिडिटी मिळते. या १४ महिन्यांदरम्यान कंपनी देशभरात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देत आहे. यासोबतच १४ महिन्यांपर्यंत युजर्स ला दररोज १०० एसएमएस वापरण्याची सुविधा मिळेल. डेटाचेही टेन्शन घेण्याचे गरज नाही. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जातो. डेटा लिमिट संपल्यानंतर कमी स्पीडवरही नेटचा वापर करता येतो.

Comments
Add Comment

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

मुबंईत येत्या मंगळवारपासून तीन दिवस १० टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे, पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील १०० किलोव्हॅट