संतोष देशमुख हत्या प्रकरण: केज, मस्साजोग येथे कडकडीत बंद

केज : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि केलेल्या छळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आणि प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र त्या घटनेचे निषेध व्यक्त होत असून केज आणि मस्साजोग येथे ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. यावेळी आंदोलकांनी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ टायर पेटवून धनंजय मुंडे यांचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांच्या मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयपणे आणि त्यांचे छळ करून मारहाण केली. त्याचे फोटो सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड चीड आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आज केज आणि मस्साजोग येथे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.


यावेळी केज शहरात नागरिकांनी रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी जमावातील तरुणांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध केला. यावेळी पोलिसांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. तसेच संतोष देशमुख यांचे गाव मस्साजोग येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मनोज जरांगे, खा. बजरंग सोनवणे, विविध पक्ष व संघटनांचे अनेक पदाधिकारी व नागरिकांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

Comments
Add Comment

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

नवले पुलावर भीषण अपघात, तीन वाहनांनी घेतला पेट, सात जणांचा मृत्यू!

चालत्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला, भरधाव कार मागून धडकली, कारच्या मागून दुसरा कंटेनर घुसला पुणे : पुणे शहरात