Navneet Rana : औरंगजेबाची कबर उखडून फेका..

  61

अबू आझमींच्या वक्तव्यावर संतापलेल्या नवनीत राणा यांची मागणी


अमरावती : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे विधान केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.


या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी अबू आझमींना छावा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, इतिहास आणि चित्रपटातून स्पष्ट होते की, औरंगजेब हा क्रूर शासक होता. छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करणारा आणि त्यांच्या डोळ्यांत सळई टाकणारा तो औरंगजेबच होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने औरंगजेबचे समर्थन करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



नवनीत राणा यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबतही तीव्र भूमिका घेत, ती खुलताबादमधून उखडून फेकावी, अशी विनंती सरकारला केली आहे. हिंदू हिताचे समर्थन न करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे मत व्यक्त करत, महायुतीचे सरकार औरंगजेबाची कबर उखडून फेकणार तर आहेच, पण ज्‍यांना औरंगजेबावर प्रेम आहे, त्‍यांनी आपल्‍या घरी ती कबर न्‍यावी, अशा शब्‍दात नवनीत राणा यांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. महायुती सरकार याबाबत लवकरच कठोर निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक