Mukhyamantri Vayoshree Yojna : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा ६९९१ जणांना लाभ

रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६ हजार ९९१ जणांना लाभ झाला असून त्यांच्या खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.


श्री. घाटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, वर्षे वय ६५ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साह्य, साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना लागू करण्यात आली आहे.



जिल्ह्तून या योजनेसाठी एकूण २१ हजार ८२ पात्र अर्ज प्राप्त झाले आहेत. शासनाकडून ६ हजार ९९१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजाराची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित १४ हजार ९१ लाभार्थ्यांनाही लवकरच हा लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. लाभ दिलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा झाल्यानंतर आधार लिंक असण्याऱ्या मोबाइल क्रमांकांवर अर्जदास बँकेमार्फत एसएमएसद्वारे संदेश पाठविला जातो. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी कळविले आहे.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची