'राहुल गांधी हजर व्हा', नाशिकच्या कोर्टाचे निर्देश

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी. जामीन हवा असेल तर आधी स्वतःचे म्हणणे मांडा नंतर जामीन अर्जावर विचार करता येईल; असे नाशिकच्या कोर्टाने सुनावले. यामुळे काँग्रेसचे लोकसभा खासदार राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे. नाशिकच्या कोर्टाने पुढील सुनावणी ९ मे रोजी ठेवली आहे. या सुनावणीवेळी राहुल यांना नाशिकच्या कोर्टात हजर व्हावे लागणार आहे.



राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढली होती. राजकीय हेतूने काढलेल्या या यात्रेत वर्धा येथे राहुल यांची सभा झाली. या सभेत बोलताना राहुल यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी सावरकरप्रेमी देवेंद् भुतडा यांनी अॅड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत नाशिकच्या फौजदारी कोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली त्यावेळी राहुल यांच्यावतीने जयंत जायभावे आणि आकाश छाजेड यांनी युक्तिवाद केला. सुनावणीवेळी राहुल यांच्यावतीने जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जावर विचार करत राहुल गांधी यांनी कोर्टात हजर होऊन स्वतःची बाजू मांडावी, असे निर्देश कोर्टाने दिले.
Comments
Add Comment

कोल्हापूरात काँग्रेसला सर्वाधिक जागा; तरीही सत्ता महायुतीचीच!

मुंबई : महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांनी साम-दाम-दंड-भेदाचा पुरेपूर वापर

अजित पवारांच्या हातून पिंपरी चिंचवडही गेले

पुण्यात उबाठाचा केवळ १ नगरसेवक विजयी ‘वंचित’ने खातेच उघडले झाले पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८

‘अण्णांनी’ केलं ‘दादांना’ गारद

मोहोळांच्या रणनितीपुढे अजित पवार फिके; राष्ट्रवादीची पडझड पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी

मालेगाव महापालिकेत ‘इस्लाम’ची मुसंडी

मुंबई : मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत इस्लाम पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून निवडणूक झालेल्या ८३

वसंतदादा पाटील यांची चौथी पिढी राजकारणात

सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील वारसदार हर्षवर्धन पाटील यांनी

लातूरमध्ये कॉग्रेसचा ‘ हात’ भारी

अमित देशमुख यांनी चक्रव्यूह भेदले लातूर : दलित, मुस्लिम आणि लिंगायत मतांचा आधार घेत आखलेल्या रणनीतीला भाजपच्या