आवडीच्या खाद्यपदार्थांना मुंबईकर मुकणार?

हायकोर्टाच्या आदेशानंतर शहरातील १४१ हॉटेल पालिकेच्या रडारवर


मुंबई : संपूर्ण जगाला प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढत चालल्या आहेत. मुंबईतही वायूप्रदुषणात वाढ झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने तोडगा काढला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात तंदूर भट्ट्या आहेत. या भट्ट्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे तंदूर भट्ट्या बंद करण्याचे आदेश महानगर पालिकेने दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलच्या हद्दीत विविध तंदूर खाद्यपदार्थ करून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या हॉटेल मालकांनाही नोटीस बजावली जात आहे. जानेवारी २०२५ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४१४ हॉटेलना नोटीस बजावली आहे.


लाकूड, कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या बेकरी, हॉटेल, उपाहारगृहे, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे व्यावसायिक हेदेखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. लाकूड, कोळसा किंवा मोडीत निघालेले फर्निचर यांचादेखील इंधन म्हणून उपयोग करतात. त्यातून घातक वायू बाहेर पडतात. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने या प्रकारच्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेतली आणि ९ जानेवारी रोजी आदेश देत ८ जुलैपर्यंत लाकूड व कोळसा आधारित सर्व हॉटेलना कायमस्वरूपी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने ४१४ हॉटेलना नोटीस बजावून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील शेगड्या वापरण्यात याव्या, असे आदेश देण्यात आले आहेत.


लाकूड, कोळशाचा वापर करून पावासारख्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या बेकऱ्यांनाही नोटीस बजावली जात आहे. मुंबईतील २६९ बेकऱ्यांना याप्रकारे नोटीस बजावली आहे, न्यायालयाचे आदेश येण्यापूर्वीच मुंबईत मागील तीन महिन्यात सुमारे ३५० बेकऱ्यांपैकी २९ बेकऱ्यांनी स्वतःहून लाकूड, कोळसा यांचा वापर बंद करून हरित इंधन स्वीकारले आहे.


मुंबईत १६ हजारांपेक्षा अधिक लहानमोठे हॉटेल असून आतापर्यंत ४१४ हॉटेलना यासंदर्भात नोटिशी बजावल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे, ६१ नोटिशी ड महापालिकेच्या ई वॉर्डमधील भायखळ्यातील हॉटेलांसाठी बजावल्या आहेत. तर वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळ या जी दक्षिण वॉर्डमध्ये १०७ हॉटेलांना नोटिशी बजावल्या आहेत. तर कुर्ला वॉर्डमध्ये ६३, परळ, लालबाग या एक दक्षिण वॉर्डमध्ये ४३ आणि सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या एच पूर्व वॉर्डमधील २६ हॉटलांना नोटीस देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी

BMC CBSE 10th Class Result : महानगरपालिका सीबीएसई मंडळाच्या दहावीचा निकाल ९२.८९ टक्के

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमांकनाचा तीढा सुटणार

 उच्चस्तरीय समिती गठीत; बाह्य सीमा निश्चित करून सरकारला शिफारशी करणार मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या

Adv. Ashish Shelar : आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे मुंबई : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023