Mumbai Weather : सकाळी गारवा, दुपारी उन्हाच्या झळा! पाहा मुंबईत कसे असेल आठवड्याचे तापमान

मुंबई : थंडीचा जोर ओसरत चालला असून उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या मुंबईकरांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाड्याला सामोरे (Heat) जावे लागत आहे. त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे (Weather Update). त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा ताप दुपारच्या वेळी अधिकच जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) आठवड्याभराचा हवामान अंदाज वर्तवला असून यामध्ये मुंबईकरांना (Mumbai Weather) सकाळी काहीसा गारवा तर दुपारी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे म्हटले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई हवामान आणि वायुमानांकन निर्देशांक २५.९९ °C पासून उष्णतेला सुरुवात झाली असून आज मुंबईचे तापमान २८.९१ °C आहे. तर उद्या मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान २५.६४ °C आणि २९.०३ °C असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, यावेळी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होणार असून दुपारी कडक ऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना सनस्क्रीन आणि सनग्लासेस लाऊनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



पुढील ७ दिवसांसाठी मुंबईचे हवामान



  • ३ मार्च २०२५ २८.९१ विखुरलेले ढग असणार आहेत.

  • ४ मार्च २०२५ २९.०१ विखुरलेले ढग असतील.

  • ५ मार्च २०२५ २९.८१ ढगाळ वातावरण

  • ६ मार्च २०२५ २९.३३ आकाश निरभ्र राहिल.

  • ७ मार्च २०२५ २९.८५ आकाश निरभ्र राहिल.

  • ८ मार्च २०२५ २९.०० आकाश निरभ्र राहिल.

  • ९ मार्च २०२५ २८.५९ आकाश निरभ्र राहिल.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या