Mumbai Weather : सकाळी गारवा, दुपारी उन्हाच्या झळा! पाहा मुंबईत कसे असेल आठवड्याचे तापमान

  98

मुंबई : थंडीचा जोर ओसरत चालला असून उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या मुंबईकरांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाड्याला सामोरे (Heat) जावे लागत आहे. त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे (Weather Update). त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा ताप दुपारच्या वेळी अधिकच जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) आठवड्याभराचा हवामान अंदाज वर्तवला असून यामध्ये मुंबईकरांना (Mumbai Weather) सकाळी काहीसा गारवा तर दुपारी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे म्हटले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई हवामान आणि वायुमानांकन निर्देशांक २५.९९ °C पासून उष्णतेला सुरुवात झाली असून आज मुंबईचे तापमान २८.९१ °C आहे. तर उद्या मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान २५.६४ °C आणि २९.०३ °C असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, यावेळी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होणार असून दुपारी कडक ऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना सनस्क्रीन आणि सनग्लासेस लाऊनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



पुढील ७ दिवसांसाठी मुंबईचे हवामान



  • ३ मार्च २०२५ २८.९१ विखुरलेले ढग असणार आहेत.

  • ४ मार्च २०२५ २९.०१ विखुरलेले ढग असतील.

  • ५ मार्च २०२५ २९.८१ ढगाळ वातावरण

  • ६ मार्च २०२५ २९.३३ आकाश निरभ्र राहिल.

  • ७ मार्च २०२५ २९.८५ आकाश निरभ्र राहिल.

  • ८ मार्च २०२५ २९.०० आकाश निरभ्र राहिल.

  • ९ मार्च २०२५ २८.५९ आकाश निरभ्र राहिल.

Comments
Add Comment

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या

भविष्यकाळात वीजदरात आणखी होणार घट

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात

मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, ५ जुलैला मुंबईत एकच अन् एकत्र मोर्चा निघणार; राऊतांची घोषणा

मुंबई : हिंदी भाषेच्या सक्तीविरीधात ठाकरे बंधू एकत्र येणार असं राज्यसभा खाजदार संजय राऊत यांनी एक्स पोस्टद्वारे

सासरचा मान घटस्फोटापर्यंत मिळणे हा प्रत्येक पत्नीचा अधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई (प्रतिनिधी) : पत्नी जर सासरी ऐशारामात राहिली असली तरी तिला तशाच प्रकारचे राहणीमान सासर सोडल्यानंतर

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई