Mumbai Weather : सकाळी गारवा, दुपारी उन्हाच्या झळा! पाहा मुंबईत कसे असेल आठवड्याचे तापमान

मुंबई : थंडीचा जोर ओसरत चालला असून उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कडाक्याची थंडी अनुभवलेल्या मुंबईकरांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उकाड्याला सामोरे (Heat) जावे लागत आहे. त्यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चच्या पहिल्या दिवसापासून शहरातील किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे (Weather Update). त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा ताप दुपारच्या वेळी अधिकच जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागाने (Meteorological Department) आठवड्याभराचा हवामान अंदाज वर्तवला असून यामध्ये मुंबईकरांना (Mumbai Weather) सकाळी काहीसा गारवा तर दुपारी उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे म्हटले आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई हवामान आणि वायुमानांकन निर्देशांक २५.९९ °C पासून उष्णतेला सुरुवात झाली असून आज मुंबईचे तापमान २८.९१ °C आहे. तर उद्या मुंबईत अनुक्रमे किमान आणि कमाल तापमान २५.६४ °C आणि २९.०३ °C असेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, यावेळी सकाळी ढगाळ वातावरण निर्माण होणार असून दुपारी कडक ऊन असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडताना सनस्क्रीन आणि सनग्लासेस लाऊनच घराबाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.



पुढील ७ दिवसांसाठी मुंबईचे हवामान



  • ३ मार्च २०२५ २८.९१ विखुरलेले ढग असणार आहेत.

  • ४ मार्च २०२५ २९.०१ विखुरलेले ढग असतील.

  • ५ मार्च २०२५ २९.८१ ढगाळ वातावरण

  • ६ मार्च २०२५ २९.३३ आकाश निरभ्र राहिल.

  • ७ मार्च २०२५ २९.८५ आकाश निरभ्र राहिल.

  • ८ मार्च २०२५ २९.०० आकाश निरभ्र राहिल.

  • ९ मार्च २०२५ २८.५९ आकाश निरभ्र राहिल.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती