Dombivali : डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरु होणार

  3784

डोंबिवली : मध्ये रेल्वेतील (Central Railway) सर्वात जास्त गर्दीचे डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्थानक आहे. वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रवाशाकरता रेल्वे गाडी वाढविण्यात आल्या असल्या तरी गर्दीत वाढ होत असताना दिसते. यावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे यांनी लक्ष देत पालिका आयुक्तांची भेट घेऊन डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरु करणाबाबत चर्चा केली. पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.



याबाबत आमदार मोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, डोंबिवलीकरांना ठाणे शहरात जाण्याकरता रेल्वेच्या गर्दीतून जाण्यावची गरज भासणार नाही.डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयजवळ ते ठाणे आणि दोन टाकी ते ठाणेशहर असा परिवहन बससेवा सुरु होणार आहे.आपल्या मागणीचा विचार करून बससेवा सुरु करणार असल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच आभार मानतो. डोंबिवली ते ठाणे अशी बससेवा सुरु होणार असल्याने आता ठाणे शहरापर्यतचा प्रवास सुखकर होणार आहे. तिकीट दराबाबत अद्याप निश्चित झाले नाही.



अपघातावर नियंत्रण येणार


सकाळवेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून पडून अनेक अपघात झाले. मात्र आता डोंबिवली ते ठाणे परिवहन बससेवा सुरु होणार असल्याने डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या स्थानकादरम्यान रेल्वे अपघातांवर नियंत्रण येईल असे डोंबिवलीकर म्हणत आहे.

Comments
Add Comment

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Gold Loan News: सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आता सोने तारण कर्ज अधिक मिळणार आरबीआयच्या 'या ' निर्णयानंतर कर्जदारांची दिवाळी

प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. छोट्या छोट्या लघू कर्जदारासाठी आरबीआयने सरलतेचे दरवाजे

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार मुंबई : दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या

आता मुंबईत किनारा मार्गावर मिळणार थांबा

पालिकेकडून 'या' चार जागांची निवड मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतच्या मुंबई सागरी

दादर केळुस्कर मार्गाच्या काँक्रिटीकरणाची कामे रद्द

मनसे, रहिवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचा निर्णय मुंबई (खास प्रतिनिधी): दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान

'प्रहार' रेपो दर कपात प्रतिक्रिया भाग २ - काय होतं आहे रेपो दराचा परिणाम जाणून घ्या तज्ज्ञांकडून......

रेपो दर प्रतिक्रिया भाग २ - काय होतं आहे रेपो दराचा परिणाम जाणून घ्या तज्ज्ञांकडून...... १) इमार इंडियाचे मुख्य