Dombivali : डोंबिवलीकरांसाठी खुशखबर! डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरु होणार

डोंबिवली : मध्ये रेल्वेतील (Central Railway) सर्वात जास्त गर्दीचे डोंबिवली (Dombivali) रेल्वे स्थानक आहे. वाढत्या गर्दीवर रेल्वे प्रवाशाकरता रेल्वे गाडी वाढविण्यात आल्या असल्या तरी गर्दीत वाढ होत असताना दिसते. यावर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश मोरे यांनी लक्ष देत पालिका आयुक्तांची भेट घेऊन डोंबिवली ते ठाणे बससेवा सुरु करणाबाबत चर्चा केली. पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले.



याबाबत आमदार मोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, डोंबिवलीकरांना ठाणे शहरात जाण्याकरता रेल्वेच्या गर्दीतून जाण्यावची गरज भासणार नाही.डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयजवळ ते ठाणे आणि दोन टाकी ते ठाणेशहर असा परिवहन बससेवा सुरु होणार आहे.आपल्या मागणीचा विचार करून बससेवा सुरु करणार असल्याने पालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच आभार मानतो. डोंबिवली ते ठाणे अशी बससेवा सुरु होणार असल्याने आता ठाणे शहरापर्यतचा प्रवास सुखकर होणार आहे. तिकीट दराबाबत अद्याप निश्चित झाले नाही.



अपघातावर नियंत्रण येणार


सकाळवेळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते.डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीतून पडून अनेक अपघात झाले. मात्र आता डोंबिवली ते ठाणे परिवहन बससेवा सुरु होणार असल्याने डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांची संख्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. या स्थानकादरम्यान रेल्वे अपघातांवर नियंत्रण येईल असे डोंबिवलीकर म्हणत आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा