विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्का शर्माने भर स्टेडियममध्ये दिली अशी प्रतिक्रिया

  86

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा शेवटचा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.या सामन्यात विराट कोहली फक्त ११ धावांवर बाद झाला.विराट बाद झाल्यानंतर अनुष्काची प्रतिक्रिया स्टेडियममधील कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. तेव्हाचा अनुष्का शर्माचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मादेखील आजचा सामना पाहण्यासाठी दुबईच्या स्टेडियममध्ये हजर होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विराट कोहली बाद झाल्यानंतर अनुष्काची काय प्रतिक्रिया काय होती ते पाहायला मिळते. कोहली अवघ्या ११ धावांवर बाद झाल्यानंतर अनुष्काने कपाळाला हात लावला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही क्षणात नाहीसा झाला. कपाळावर हात मारल्यानंतर अनुष्का काहीतरी अस्पष्ट बोलल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले. अनुष्काच्या तोंडी चुकून अपशब्द आल्याचे काही यूजर्सनी म्हटले आहे.


विराट कोहलीसाठी आजचा सामना महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या कारकीर्दीतला हा ३०० वा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आहे. पण या सामन्यात तो लवकर बाद झाला. सातव्या षटकामध्ये कोहलीने ऑफ साइडला शॉट मारला. पॉइंटवर उभ्या असलेल्या ग्लेन फिलिप्सने हवेत उंच उडी मारत झेल घेतला आणि विराटला बाद केले.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल