LPG Gas Cylinder Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांची वाढ

नवी दिल्ली : ऐन होळी आणि ईदपूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर केली आहे. इंडियन ऑईलने १ मार्चपासून १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे दिल्लीत या सिलिंडरची किंमत १७९७ रुपयांवरून १८०३ रुपयावर पोहोचली आहे. दरम्यान घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही वाढ करण्यात येत नसल्याचं कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.


सरकारी कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार या कंपन्यांनी आजपासून नव्या किंमती लागू केल्या आहेत. मात्र, हा सणासुदीचा महिना आहे. याच महिन्यात होळी आणि ईद हे सण आहेत. उद्यापासून रमजानचा महिना सुरु होतं आहे. याशिवाय अनेक लग्नकार्यही या महिन्यात पार पाडणार आहेत. त्यामुळे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा इतर पदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.



नव्या दरानुसार दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १७९७ वरून १८०३ रुपये करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये या सिलिंडरची १९०७ वरून १९१३ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर १७४९.५० वरून १७५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये, व्यावसायिक सिलिंडरचे दर १९५९ वरून १९६५ रुपयांवर पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

भारताची अमेरिकेला निर्यात थांबणार?

अमेरिकेकडून रशियावर ५०० टक्के आयात कर ब्राझिल आणि चीनलाही इशारा पुतिन निष्पाप लोकांची हत्या करत असल्याचा

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज