चारचाकी वाहनांमुळे थांबला लाडक्या बहिणींचा लाभ

  69

सोलापूर: जिल्ह्यातील ११ लाख सहा हजार महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी महिला व बालकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील साडेबारा हजार महिलांची यादी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली असून त्यांच्याकडील चारचाकी वाहनांची पडताळणी अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्या साडेबारा हजार महिला लाभार्थींची पडताळणी पूर्ण न झाल्याने जिल्ह्यातील ११ लाख महिलांचा फेब्रुवारीचा लाभ थांबला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख महिलांनी स्वत:च्या मोबाईलवरून अर्ज केले असून त्यांना अंगणवाडी सेविकांनीही मदत केली. तर अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केल्यावर त्यावर साडेसहा लाख महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यांना १ जुलैपासून योजनेचा लाभ सुरू झाला, पण आता विधानसभा निवडणुकीनंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी सुरू केल्याने अनेकांची झोप उडाली आहे.

दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित आहे, पण आता फेब्रुवारी संपला तरीदेखील लाडक्या बहिणींना या महिन्याचा लाभ मिळालेला नाही. आता मार्च महिन्यात दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार असून तोवर चारचाकी वाहने असलेल्या लाडक्या बहिणींची पडताळणी देखील पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक