Maharashtra Weather : मार्च महिन्यात तापमान वाढीची शक्यता

नवी दिल्ली : यंदा मार्च महिन्यात इतर वर्षांच्या तुलनेत अधिक उष्णतेची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने आज, शुक्रवारी दिली. भारतीय हवामान विभागाने या वर्षीतील मार्च महिना सर्वात उष्ण असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिवसाचे तापमान वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर अनेक राज्यांमध्ये महिन्याच्या अखेरीस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस (१०४° फॅरेनहाइट) पेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांने सांगितले.

उत्तर आणि मध्य भारतातील गहू उत्पादक राज्यांमध्ये मार्चच्या मध्यापासून तापमानात तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्यपेक्षा ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमधील हवामान गहू, हरभरा आणि रेपसीड पिकांसाठी अनुकूल राहणार नाही, कारण त्यांना उष्णतेच्या ताणाचा सामना करावा लागू शकतो इशारा त्यांनी दिला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लागवड केलेली ही हिवाळी पिके त्यांच्या वाढीच्या चक्रात थंड तापमानावर अवलंबून असतात आणि त्यामुळे चांगले उत्पादन मिळते.



जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश म्हणून, २०२२ पासून सलग ३ वर्षे खराब पीक घेतल्यानंतर महागड्या आयातीची गरज टाळण्यासाठी भारत २०२५ मध्ये भरपूर पीक घेण्याची आशा करत आहे. तथापि, जास्त उष्णतेमुळे सलग चौथ्या वर्षी उत्पादन कमी होऊ शकते, ज्यामुळे सरकार आयातीला परवानगी देण्यासाठी आणि पुरवठ्याची कमतरता कमी करण्यासाठी विद्यमान ४० टक्के आयात कर कमी करू शकते अथवा तो हटवू शकते.
Comments
Add Comment

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”: