अलिबाग : अलिबागच्या समुद्रात मच्छीमारांच्या बोटीला आग लागली आहे. ही दुर्घटना आज (शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२५) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मासेमारीच्या बोटीला आग लागली. बोटीत २० जण होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. आग लागल्यामुळे बोट ८० टक्के जळून खाक झाली.
बोटीच्या वरील जाळी देखील जळाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…
भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…
अॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…
राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…
प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…