मुंबई: पुण्याच्या स्वारगेट बस स्टँडवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलिसांना आरोपीला पकडण्यात मोठे यश मिळाले आहे. ३७ वर्षीय आरोपी दत्तात्रय रामदास ...
बोगद्यामुळे बदलापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. रस्ते मार्गाने प्रवास वेगवान होणार असल्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरात औद्योगिक क्षेत्राला तसेच गोदामांशी सेवांना चालना मिळण्याची शक्यता आहे. यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल.
वडोदरा अर्थात बडोदा ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. हा महामार्ग १२० मीटर रुंद आणि १८९ किलोमीटर लांबीचा, आठ लेनचा (मार्गिका) आहे आणि पूर्णत्वाच्या जवळ आहे. नवीन रस्त्यामुळे वडोदरा (बडोदा) आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल. वाहतुकीचा वेग वाढेल.
दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा लवकरच कार्यरत होणार असल्यामुळे नवी मुंबई आणि पनेवल पट्ट्यातील अर्थचक्राला गती येईल. या भागात उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.