बदलापूर - नवी मुंबई बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार

बदलापूर : बदलापूर पूर्व ते नवी मुंबई हा बोगदा २०२६ पासून कार्यरत होणार आहे. या बोगद्यामुळे बदलापूर ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटांत करता येईल. हा मार्ग बदलापूरमधील बेंडशील गावाला कल्याण तालुक्यातील रायतेशी जोडेल. यामुळे मुंबई, पालघर आणि पुढे गुजरातपर्यंत रस्ते मार्गाने वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे.



बोगद्यामुळे बदलापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. रस्ते मार्गाने प्रवास वेगवान होणार असल्यामुळे बदलापूर आणि आसपासच्या परिसरात औद्योगिक क्षेत्राला तसेच गोदामांशी सेवांना चालना मिळण्याची शक्यता आहे. यातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल.

वडोदरा अर्थात बडोदा ते जेएनपीटी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. हा महामार्ग १२० मीटर रुंद आणि १८९ किलोमीटर लांबीचा, आठ लेनचा (मार्गिका) आहे आणि पूर्णत्वाच्या जवळ आहे. नवीन रस्त्यामुळे वडोदरा (बडोदा) आणि मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी होईल. वाहतुकीचा वेग वाढेल.

दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा लवकरच कार्यरत होणार असल्यामुळे नवी मुंबई आणि पनेवल पट्ट्यातील अर्थचक्राला गती येईल. या भागात उद्योगांना चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

महापौर निवडणुकीसाठी अवधी कमी, सुट्टीच्या दिवशी करावी लागणार महापौरांची निवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक येत्या ३० जानेवारीला होण्याची शक्यता वर्तवली जात असली

मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना नेत्यांची दिल्लीत बैठक

मुंबई : मुंबईच्या महापौर पदाबाबत सोमवारी सायंकाळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये दिल्लीत खल झाला. शिवसेनेचे

कुर्ला येथील विविध परिसरातील ७१ अनधिकृत बांधकामांचे निष्कासन

अनधिकृत फेरीवाले, पदपथावरील अनधिकृत दुकाने आदींचा कारवाईत समावेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’

Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात माघी गणेश जयंतीचा जल्लोष! काकड आरतीने सुरुवात; गायन, वादन, २२ जानेवारीला निघणार भव्य रथ शोभायात्रा

मुंबई : प्रभादेवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त भव्य 'माघ श्री

Mumbai Western Express Highway | कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग

मुंबई : मालाड कांदिवलीच्यामध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, मेट्रो

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून