पुणे महापालिकेचा चार मार्चला होणार सादर अर्थसंकल्प

  53

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेचा आगामी वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प राजकीय हस्तक्षेपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले अर्थसंकल्प सादर करताना त्यात पुणेकरांसाठी काय नवे देणार? यात कोणत्या कामाला प्राधान्य असणार याची उत्सुकता आहे. याचा उलगडा ४ मार्च रोजी होणार असून, आयुक्त या दिवशी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


पुणे महापालिकेवर प्रशासक असल्याने आयुक्तांकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प अंतिम केला जातो. प्रशासक काळात सादर केला जाणारा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. आयुक्त भोसले यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधान भवनात बैठक घेतल्याने विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल असे आश्वासन दिले आहे.


त्यामुळे आयुक्त भाजपच्या सोईचा अर्थसंकल्प तयार करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांवर भर असणार आहे?, काय नवे प्रकल्प पुण्याला देणार? की राजकीय प्रभाव असलेला अर्थसंकल्प सादर करणार याकडे लक्ष लागले आहे. ४ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयुक्त स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. तेथेच लगेच मुख्यसभेची मान्यता ही दिली जाणार आहे. यासंदर्भात नगरसचिव विभागास आयुक्तांनी पत्र दिले आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली