पुणे महापालिकेचा चार मार्चला होणार सादर अर्थसंकल्प

  61

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेचा आगामी वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प राजकीय हस्तक्षेपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले अर्थसंकल्प सादर करताना त्यात पुणेकरांसाठी काय नवे देणार? यात कोणत्या कामाला प्राधान्य असणार याची उत्सुकता आहे. याचा उलगडा ४ मार्च रोजी होणार असून, आयुक्त या दिवशी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


पुणे महापालिकेवर प्रशासक असल्याने आयुक्तांकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प अंतिम केला जातो. प्रशासक काळात सादर केला जाणारा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. आयुक्त भोसले यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधान भवनात बैठक घेतल्याने विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल असे आश्वासन दिले आहे.


त्यामुळे आयुक्त भाजपच्या सोईचा अर्थसंकल्प तयार करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांवर भर असणार आहे?, काय नवे प्रकल्प पुण्याला देणार? की राजकीय प्रभाव असलेला अर्थसंकल्प सादर करणार याकडे लक्ष लागले आहे. ४ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयुक्त स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. तेथेच लगेच मुख्यसभेची मान्यता ही दिली जाणार आहे. यासंदर्भात नगरसचिव विभागास आयुक्तांनी पत्र दिले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या