महापालिका निवडणुका कधी होणार? आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

मुंबई (खास प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, न्यायालय या संदर्भात शासनाला काय निर्देश देते आणि पुढील सुनावणीची तारीख काय देते याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात की, मे महिन्यांत की ऑक्टोबरमध्ये जाणार हे या सुनावणीतून स्पष्ट होईल.


मुंबई महापालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील पाच ते सहा वर्षांपासून झालेल्या नाहीत. या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. अनेक महिन्यांपासून न्यायालयात पाचिका सुनावणीसाठी आली नव्हती.


२८ जानेवारी २०२५ रोजी याची सुनावणी होऊन लवकरच याबाबतचा निर्णय दिला जाईल आणि निवडणुकीचा मार्ग खुला होईल, असे बोलले जात होते; परंतु न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २५ फेब्रुवारीपर्यंत पुढे उकलल्याने महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यातच होतील अशाप्रकारचे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे; परंतु काही विधी तन्ज आणि निवडणूक विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सर्वोच्च न्यायालय नक्की पुढील तारीख देते की काही स्पष्ट निर्देश देते याकडे सर्वांचे लक्ष असेल.


मुंबई महापालिकेचे २२७ प्रभागांच्या तुलनेत २३६ प्रभाग आघाडी सरकारच्या काळात करण्यात आले असून जुलै २०२२ मध्ये सेना भाजपा सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द केला. याला विरोधकांनी आक्षेप नोंदवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती, या याचिकेवर न्यायालयाने शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २२७ प्रभाग राखण्याबाबत निर्णय दिल्याने मा निर्णयाविरोधात विरोधी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. त्यामुळे २२७ की २३६ प्रभाग, ओबीसी या अशा विविध याचिकेंची एकत्रित सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळ आणि स्थानके

मुंबई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद