DA Hike : डीए वाढल्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’!

३ टक्के वाढीने राज्य सरकारचे कर्मचारी होणार मालामाल


७ महिन्यांच्या फरकामुळे मार्चमध्ये होणार अकाऊंट फुल्ल


मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या (State Government) निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून खऱ्या अर्थांने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ (DA Hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातला शासन निर्णयही निघाला असून यामध्ये कर्मचाऱ्यांना (Government Employees) कोणत्या महिन्यापासून वाढीव डीए मिळणार, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.



राज्य सरकारच्या वित्त विभागाने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात १ जुलै २०२४ पासून सुधारण करण्यात आली आहे. या सुधारणेनुसार महागाई भत्त्याचा दर ५० टक्क्यांवरून ५३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या डीए दरामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशेष, म्हणजे हा वाढीव डीए १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.



फेब्रुवारी महिन्यात मिळणार थकबाकी डीए


या शासन निर्णयानुसार वाढीव डीए १ जुलै २०२४ पासून लागू होईल. हा वाढीव डीए फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात दिला जाईल. म्हणजेच १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या सात महिन्यांचा वाढीव डीए फेब्रुवारी २०२५ महिन्याच्या वेतनात थकबाकी म्हणून दिला जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या डीएमध्ये वाढ करावी, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्नही चालू होते. दरम्यान, सरकारने सध्याच्या महागाईचा विचार लक्षात घेता डीएमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शासकीय कर्मचारी स्वागत करत आहेत. सात महिन्यांचा थकित डीए आता फेब्रुवारी महिन्याच्या पगारात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.



१७ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा


दरम्यान, केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने हा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ५० टक्के असलेला महागाई भत्ता ५३ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाचा राज्यातील एकूण १७ लाख शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीच्या महिन्यात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वाढीव पगार मिळेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याची सातत्याने चर्चा होत आहे. तसेच या मुद्द्यावरुन राज्य सरकारबाबत वेगवेगेळे तर्क लावले जात आहेत. अशा विविध योजनांमुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती अडचणीत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. तसेच विरोधकांकडूनही या मुद्द्यावरुन राज्य सरकारला घेरले जात होते. पण राज्य सरकारने महाराष्ट्र शासनातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारी तिजोरीत कोणताही खडखडाट नाही हे स्पष्ट होत आहे. तसेच राज्य सरकारला आर्थिक परिस्थितीबाबत विश्वास आहे आणि सरकार त्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट होत आहे.



केंद्रीय सरकारकडूनही घोषणा होण्याची शक्यता


दरम्यान, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचादेखील महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मार्च महिन्यात होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्र सरकारकडून तशी घोषणा करण्यात आलेली नाही. पण तशी घोषणा होऊ शकते अशी चर्चा आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य