पालघरमधील औषध निर्मात्या कंपनीवर कारवाई, दोन पेनकिलर औषधांवर बंदी

पालघर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील एव्हिओ (Aveo) नावाच्या औषध कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉल या दोन औषधांचे उत्पादन आणि निर्यात करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ही दोन वेदनाशामक औषधे अर्थात पेनकिलर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या औषधांमुळे आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये आरोग्य संकट निर्माण झाल्याचे वृत्त 'बीबीसी'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन केंद्र सरकारने कारवाई केली आहे. भारताचे औषध आणि नियंत्रक जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी यांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५० अंतर्गत कंपनीला आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.



टॅपेंटाडॉल तीव्र वेदनांचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. तर कॅरिसोप्रोडॉल स्नायूंना शिथील करण्यास आणि वेदनांचे शमन करण्यास उपयुक्त आहे. प्रामुख्याने हाडांशी संबंधित दुखापती झाल्यास वेदनांचे शमन करण्यासाठी कॅरिसोप्रोडॉल उपयुक्त आहे. एव्हिओ फार्मास्युटिकल्स कोणत्याही मंजुरीशिवाय दोन्ही औषधांचे मिश्रण म्हणून टॅफ्रोडॉल ब्रँड तयार करत होते. हे औषध आफ्रिका खंडात निर्यात केले जात होते.



बीबीसीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषध आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये विकण्यासाठी पाठवले जात असल्याचे सांगितले. कंपनीच्या औषधामुळे आफ्रिकेत आरोग्य संकट निर्माण झाले. यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे कारवाई केली. देशाची आणि राज्याची बदनामी करणारे विघातक कार्य केल्याप्रकरणी एव्हिओ कंपनी आणि तिच्याशी संबंधित अनेकांवर कारवाई सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध