पालघरमधील औषध निर्मात्या कंपनीवर कारवाई, दोन पेनकिलर औषधांवर बंदी

  76

पालघर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील एव्हिओ (Aveo) नावाच्या औषध कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉल या दोन औषधांचे उत्पादन आणि निर्यात करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ही दोन वेदनाशामक औषधे अर्थात पेनकिलर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या औषधांमुळे आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये आरोग्य संकट निर्माण झाल्याचे वृत्त 'बीबीसी'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन केंद्र सरकारने कारवाई केली आहे. भारताचे औषध आणि नियंत्रक जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी यांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५० अंतर्गत कंपनीला आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.



टॅपेंटाडॉल तीव्र वेदनांचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. तर कॅरिसोप्रोडॉल स्नायूंना शिथील करण्यास आणि वेदनांचे शमन करण्यास उपयुक्त आहे. प्रामुख्याने हाडांशी संबंधित दुखापती झाल्यास वेदनांचे शमन करण्यासाठी कॅरिसोप्रोडॉल उपयुक्त आहे. एव्हिओ फार्मास्युटिकल्स कोणत्याही मंजुरीशिवाय दोन्ही औषधांचे मिश्रण म्हणून टॅफ्रोडॉल ब्रँड तयार करत होते. हे औषध आफ्रिका खंडात निर्यात केले जात होते.



बीबीसीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषध आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये विकण्यासाठी पाठवले जात असल्याचे सांगितले. कंपनीच्या औषधामुळे आफ्रिकेत आरोग्य संकट निर्माण झाले. यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे कारवाई केली. देशाची आणि राज्याची बदनामी करणारे विघातक कार्य केल्याप्रकरणी एव्हिओ कंपनी आणि तिच्याशी संबंधित अनेकांवर कारवाई सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक