पालघरमधील औषध निर्मात्या कंपनीवर कारवाई, दोन पेनकिलर औषधांवर बंदी

पालघर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील एव्हिओ (Aveo) नावाच्या औषध कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉल या दोन औषधांचे उत्पादन आणि निर्यात करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ही दोन वेदनाशामक औषधे अर्थात पेनकिलर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या औषधांमुळे आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये आरोग्य संकट निर्माण झाल्याचे वृत्त 'बीबीसी'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन केंद्र सरकारने कारवाई केली आहे. भारताचे औषध आणि नियंत्रक जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी यांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५० अंतर्गत कंपनीला आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.



टॅपेंटाडॉल तीव्र वेदनांचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. तर कॅरिसोप्रोडॉल स्नायूंना शिथील करण्यास आणि वेदनांचे शमन करण्यास उपयुक्त आहे. प्रामुख्याने हाडांशी संबंधित दुखापती झाल्यास वेदनांचे शमन करण्यासाठी कॅरिसोप्रोडॉल उपयुक्त आहे. एव्हिओ फार्मास्युटिकल्स कोणत्याही मंजुरीशिवाय दोन्ही औषधांचे मिश्रण म्हणून टॅफ्रोडॉल ब्रँड तयार करत होते. हे औषध आफ्रिका खंडात निर्यात केले जात होते.



बीबीसीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषध आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये विकण्यासाठी पाठवले जात असल्याचे सांगितले. कंपनीच्या औषधामुळे आफ्रिकेत आरोग्य संकट निर्माण झाले. यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे कारवाई केली. देशाची आणि राज्याची बदनामी करणारे विघातक कार्य केल्याप्रकरणी एव्हिओ कंपनी आणि तिच्याशी संबंधित अनेकांवर कारवाई सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई