पालघरमधील औषध निर्मात्या कंपनीवर कारवाई, दोन पेनकिलर औषधांवर बंदी

पालघर : केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील एव्हिओ (Aveo) नावाच्या औषध कंपनीवर कारवाई केली आहे. या कंपनीच्या टॅपेंटाडॉल आणि कॅरिसोप्रोडॉल या दोन औषधांचे उत्पादन आणि निर्यात करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ही दोन वेदनाशामक औषधे अर्थात पेनकिलर असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीच्या औषधांमुळे आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये आरोग्य संकट निर्माण झाल्याचे वृत्त 'बीबीसी'ने दिले होते. या वृत्ताची दखल घेऊन केंद्र सरकारने कारवाई केली आहे. भारताचे औषध आणि नियंत्रक जनरल डॉ. राजीव सिंग रघुवंशी यांनी ही कारवाई केल्याची माहिती दिली. औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५० अंतर्गत कंपनीला आधीच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.



टॅपेंटाडॉल तीव्र वेदनांचे शमन करण्यासाठी उपयुक्त आहे. तर कॅरिसोप्रोडॉल स्नायूंना शिथील करण्यास आणि वेदनांचे शमन करण्यास उपयुक्त आहे. प्रामुख्याने हाडांशी संबंधित दुखापती झाल्यास वेदनांचे शमन करण्यासाठी कॅरिसोप्रोडॉल उपयुक्त आहे. एव्हिओ फार्मास्युटिकल्स कोणत्याही मंजुरीशिवाय दोन्ही औषधांचे मिश्रण म्हणून टॅफ्रोडॉल ब्रँड तयार करत होते. हे औषध आफ्रिका खंडात निर्यात केले जात होते.



बीबीसीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषध आफ्रिका खंडातील नायजेरिया, घाना, कोट डी'आयव्होअर आदी देशांमध्ये विकण्यासाठी पाठवले जात असल्याचे सांगितले. कंपनीच्या औषधामुळे आफ्रिकेत आरोग्य संकट निर्माण झाले. यानंतर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने संयुक्तपणे कारवाई केली. देशाची आणि राज्याची बदनामी करणारे विघातक कार्य केल्याप्रकरणी एव्हिओ कंपनी आणि तिच्याशी संबंधित अनेकांवर कारवाई सुरू झाली आहे.
Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव