Tarkarli Beach : तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोघा पर्यटकांचा मृत्यू

  134

मालवण : तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे-हडपसर येथील रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) या दोघा पर्यटकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रकिनारी घडली.



हवेली तालुक्यातील कुश गदरे (२१), रोहन डोंबाळे (२०), ओंकार भोसले (२४), रोहित कोळी (२१), शुभम सोनवणे (२२) हे युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात आत ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यावसायिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने शोध कार्य सुरू करण्यात आला.
Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी

मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, एनडीआरएफकडून तरुणाचा शोध सुरु...

सावंतवाडी : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साठल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा

Ganesh Festival 2025 : चला गणपतीक गावाक जाऊचा असा; नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होतला…

कोकण मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाचे वेळापत्रक जारी झाल्याने रेल्वेच्या नियमांप्रमाणे ६० दिवसांचे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सेवानिवृत्त युद्धनौकेचे नवे स्वरूप, सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना  मुंबई: आयएनएस गुलदार या नौदलातून

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण