Telangana : तेलंगणा बोगदा दुर्घटना, अडकलेल्या आठ जणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू

श्रीशैलम : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलममध्ये कालव्यातील पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एका बोगद्याचे काम सुरू असताना दरड कोसळली. यामुळे बोगद्याची दोन्ही बाजूची वाट बंद झाली आणि आठ जण बोगद्यात अडकले. यात दोन अभियंते, जयप्रकाश असोसिएट्सचे चार मजूर आणि अमेरिकेतील कंपनीचे दोन तंत्रज्ञ आहेत. या आठ जणांव्यतिरिक्त आणखी ४२ जण बोगद्यात होते. पण दरड कोसळू लागल्यावर ते ४२ जण धावत बोगद्यातून बाहेर आले. वाट बंद झाल्याने इतर ८ जणांना बाहेर येणे अशक्य झाले.



बोगद्यात अडकलेल्या आठ जणांच्या सुटकेसाठी ढिगारा उपसून मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. मदतकार्य करत असलेले पथक बोगद्यात १३ किमी. आतपर्यंत पोहोचले आहे. अद्याप मदतकार्य करणाऱ्यांना अडकलेल्या ८ जणांपैकी कोणीही दिसलेले नाही.



बाहेर आलेल्या ४२ जणांनी दिलेल्या माहितीआधारे ज्या ठिकाणी सर्वात आधी वाट बंद झाली त्या ठिकाणाजवळ मदतकार्य करणारे पथक पोहोचले आहे. या ठिकाणी पोहोचल्यावर हाका मारण्यात आल्या. पण प्रतिसाद मिळाला नाही. अडकलेले आठ जण बंदीस्त वातावरणात बेशुद्ध पडले असतील अशी शक्यता गृहित धरुन आणखी ढिगारा उपसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अडकलेल्या आठ जणांना शोधून बोगद्याबाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



तेलंगणा सरकारचे मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी आणि जे कृष्ण राव हे मदतकार्याचा सतत आढावा घेत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मदतकार्याचा आढावा घेतला. लागेल ती मदत पुरविण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना दिले.
Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना