Telangana : तेलंगणा बोगदा दुर्घटना, अडकलेल्या आठ जणांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू

श्रीशैलम : तेलंगणातील नागरकुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलममध्ये कालव्यातील पाण्याच्या व्यवस्थापनासाठी एका बोगद्याचे काम सुरू असताना दरड कोसळली. यामुळे बोगद्याची दोन्ही बाजूची वाट बंद झाली आणि आठ जण बोगद्यात अडकले. यात दोन अभियंते, जयप्रकाश असोसिएट्सचे चार मजूर आणि अमेरिकेतील कंपनीचे दोन तंत्रज्ञ आहेत. या आठ जणांव्यतिरिक्त आणखी ४२ जण बोगद्यात होते. पण दरड कोसळू लागल्यावर ते ४२ जण धावत बोगद्यातून बाहेर आले. वाट बंद झाल्याने इतर ८ जणांना बाहेर येणे अशक्य झाले.



बोगद्यात अडकलेल्या आठ जणांच्या सुटकेसाठी ढिगारा उपसून मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. मदतकार्य करत असलेले पथक बोगद्यात १३ किमी. आतपर्यंत पोहोचले आहे. अद्याप मदतकार्य करणाऱ्यांना अडकलेल्या ८ जणांपैकी कोणीही दिसलेले नाही.



बाहेर आलेल्या ४२ जणांनी दिलेल्या माहितीआधारे ज्या ठिकाणी सर्वात आधी वाट बंद झाली त्या ठिकाणाजवळ मदतकार्य करणारे पथक पोहोचले आहे. या ठिकाणी पोहोचल्यावर हाका मारण्यात आल्या. पण प्रतिसाद मिळाला नाही. अडकलेले आठ जण बंदीस्त वातावरणात बेशुद्ध पडले असतील अशी शक्यता गृहित धरुन आणखी ढिगारा उपसण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अडकलेल्या आठ जणांना शोधून बोगद्याबाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



तेलंगणा सरकारचे मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी आणि जे कृष्ण राव हे मदतकार्याचा सतत आढावा घेत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी मदतकार्याचा आढावा घेतला. लागेल ती मदत पुरविण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना दिले.
Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ