Railway News : जलद हार्बर स्वप्नातच राहणार

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशी जलद हार्बर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये सादर केला होता. या प्रस्तावानुसार ७५ मिनिटांचा प्रवास ४८ मिनिटांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी (CSMT Mumbai), वडाळा, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द, नेरुळ, बेलापूर ही उन्नत स्थानके, तर वाशी खारघर आणि पनवेल या विद्यमान मार्गांना समांतर असण्याचे नियोजन होते. यासाठी खाडीवर या प्रकल्पाचे बांधकाम प्रस्तापित होते. हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून जात असल्याने त्याचा मोठा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला असता. पण हा प्रकल्प स्वप्नातच राहण्याची चिन्ह आहेत.



प्रस्ताव स्वरुपात सादर झालेल्या प्रकल्पानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ येथून उन्नत जलद हार्बर सेवेचे नियोजन होते. सध्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास योजनेशी संबंधित कामं सुरू आहेत. यामुळे उन्नत मार्गाचे आणि त्यासाठीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे सध्या हा प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे स्वप्नातली जलद हार्बर सेवा आता स्वप्नातच राहण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Gold Smuggling : मुंबई विमानतळावर डीआरआयची कारवाई, ५ कोटींचे सोने जप्त; ७ अटकेत

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या

मुंबई - गुजरात महामार्गावर वाहतूक कोंडी ; गॅस टँकर उलटला

पालघर : मुंबई-गुजरात महामार्गावरून जात असताना गॅस टँकर उलटला. चालकाचे नियंत्रण सुटले आणि गॅस टँकर खोल खड्ड्यात

Eknath Shinde : वरळीतील हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये दुर्दैवी मृत्यू! आयोजक चौकशीच्या फेऱ्यात, एकनाथ शिंदेंचा इशारा

मुंबई : मुंबईतील वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका हायप्रोफाईल कॉन्सर्टदरम्यान २८

Ameet Satam : अंधेरीच्या क्रीडा संकुलातील ५६ खोल्यांचा बेकायदा गैरवापर

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे चौकशीचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेने अंधेरी

Tajinder Singh Tiwana : प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिझास्टर कंट्रोल रूम” सुरू

मुंबई : पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध

Maharashtra : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, मान्सून कोकणात पोहोचला तरी...

मुंबई : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत