'उद्धव ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळायचं'

नवी दिल्ली : उद्धव ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्यावर एक पद मिळायचं असे वक्तव्य शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.



उद्धव ठाकरे २०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर आमदारांना वाटले बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. पण त्यावेळी कोणालाही माहित नव्हते की, अनेक आमदारांना उद्धव ठाकरेंना भेटताच येणार नाही. कुठल्याच विषयासाठी उद्धव ठाकरे भेटीची वेळ देणार नाहीत. दिवसातून दोन ते तीन वेळा आरटीपीसीआर केली तरी भेट नाही. स्थित्यंतराचे हे एक कारण असल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.



विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील पक्षाचे ५६ आमदार निवडून आले. त्यांना शरद पवारांच्या नेतृत्वातील ५४ आमदार निवडून आलेल्या पक्षाने तसेच ४४ आमदार निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला. यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. पण त्यांच्या आमदारांमध्ये उद्धव ठाकरेंविषयीची नाराजी वाढली. काही काळानंतर उद्धव यांच्यासोबतच्या बहुसंख्य आमदारांनी नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय ठामपणे घेतला. उद्धव यांचे विचार बहुसंख्य आमदारांपेक्षा वेगळे होते. बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज येताच विरोधकांनी सत्ताधारी अल्पमतात असल्याचे सांगत विश्वासमताचा ठराव आणून बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान उद्धव यांना दिले. उद्धव यांनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याऐवजी राजीनामा देण्याचा निरणय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा - शिवसेना यांच्या महायुतीचे सरकार सत्तेत आले. शिवसेना आमदारांच्या पाठिंब्यामुळे एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद वाढली. यानंतर विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५७ जागांवर विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नीलम गोऱ्हे यांनी गौप्यस्फोट केला.
Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे