पाकिस्तानची दाणादाण, भारतापुढे २४२ धावांचे आव्हान

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पण त्यांना ५० षटके खेळणे जमले नाही. पाकिस्तानचा डाव ४९.४ षटकांत आटोपला. कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव २४१ धावांत आटोपला. आता भारतापुढे ५० षटकांत २४२ धावा करण्याचे आव्हान आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास साखळीतील सलग दोन सामने जिंकत भारत उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले.



प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचे सलामीचे दोन फलंदाज ५० धावा होण्याआधीच परतले. पाकिस्तानचा अर्धा संघ १६५ धावांवर बाद झाला होता. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव आणखी वाढवला आणि पाकिस्तान २५० धावांचा टप्पा गाठू शकणार नाही याची खबरदारी घेतली.

सलामीला आलेला बाबर आझम २३ धावा केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. अक्षर पटेलने त्याला धावचीत केले. कर्णधार असलेला मोहम्मद रिझवान ४६ धावा केल्यानंतर अक्षर पटेलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सौद शकील ६२ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. तय्यब ताहिर चार धावा करुन रविंद्र जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सलमान आघा १९ धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. शाहीन आफ्रिदी शून्य धावांवर कुलदीप यादवच्या चेंडूवर पायचीत झाला. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देत तंबूत परतला. हारिस रौफ आठ धावा केल्यावर धावचीत झाला. त्याला अक्षर पटेलने यष्टीरक्षक केएल राहुलच्या मदतीने बाद केले. खुशदिल शाह ३८ धावा करुन हर्षित राणाच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. अबरार अहमद शून्य धावा करुन नाबाद राहिला.

भारताकडून कुलदीप यादवने तीन, हार्दिक पांड्याने दोन तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत – पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

'न्यूझीलंड'ने इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल!

कोहलीची झुंजार खेळी व्यर्थ; भारताचा ४१ धावांनी पराभव इंदोर (वृत्तसंस्था) : न्यूझीलंड संघाने भारताचा तिसऱ्या

किवींच्या 'मिशेल-फिलिप्स'चा झंझावात; निर्णायक वन-डेमध्ये भारतासमोर हे लक्ष्य

इंदूर (वृत्तसंस्था): भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर वन-डे मालिकेतील

Shubman Gill water purifier : मॅचपेक्षा पाण्यावर लक्ष! शुभमन गिलने इंदूरमध्ये नेले ३ लाखांचे वॉटर प्युरिफायर

इंदूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे, त्यामुळे इंदूरमध्ये होणारा तिसरा

भारतीय संघाच्या टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुंग

सुंदर दुखापतग्रस्त; आयुष बदोनीला संधी? मुंबई : आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या तोंडावर भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणीत

टी-२० मध्ये शतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर

विराट कोहलीचा विक्रम मोडला मुंबई : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी

विराट कोहलीच्या बाबतीत आयसीसीने चूक वेळीच सुधारली

८२५ नव्हे, तर १५४७ दिवस होता अव्वल स्थानी मुंबई : विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार