Railway News : जलद हार्बर स्वप्नातच राहणार

मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अशी जलद हार्बर सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव २०१९ मध्ये सादर केला होता. या प्रस्तावानुसार ७५ मिनिटांचा प्रवास ४८ मिनिटांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी (CSMT Mumbai), वडाळा, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर, मानखुर्द, नेरुळ, बेलापूर ही उन्नत स्थानके, तर वाशी खारघर आणि पनवेल या विद्यमान मार्गांना समांतर असण्याचे नियोजन होते. यासाठी खाडीवर या प्रकल्पाचे बांधकाम प्रस्तापित होते. हा प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून जात असल्याने त्याचा मोठा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला असता. पण हा प्रकल्प स्वप्नातच राहण्याची चिन्ह आहेत.



प्रस्ताव स्वरुपात सादर झालेल्या प्रकल्पानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ येथून उन्नत जलद हार्बर सेवेचे नियोजन होते. सध्या या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास योजनेशी संबंधित कामं सुरू आहेत. यामुळे उन्नत मार्गाचे आणि त्यासाठीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे सध्या हा प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे मत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे स्वप्नातली जलद हार्बर सेवा आता स्वप्नातच राहण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत