Shaktikanta Das : शक्तिकांता दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले. अशातच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी आरबीआय गर्व्हनर शक्तिकांता दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपणार.


तत्पूर्वी शंक्तिकांता दास यांनी डिसेंबर २०१८ मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आणि त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०१४ रोजी संपला होता. त्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.



मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ म्हणून श्री शक्तिकांता दास, आयएएस (निवृत्त) (तामिळनाडू:१९८०) यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल ते संपणार आहे.


दास यांच्या नियुक्तीनंतर राजकीय आणि आर्थिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील

छत्तीसगडमधील बेकायदेशीर सामूहिक धर्मांतरास जन्मठेपेची शिक्षा

धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर बळजबरी आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतरासाठी कठोर दंडात्मक तरतुदी रायपूर : छत्तीसगड

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर