Shaktikanta Das : शक्तिकांता दास यांची पंतप्रधान मोदींच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास हे काही दिवसांपूर्वीच सेवानिवृत्त झाले. अशातच त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. माजी आरबीआय गर्व्हनर शक्तिकांता दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळासोबतच संपणार.


तत्पूर्वी शंक्तिकांता दास यांनी डिसेंबर २०१८ मध्ये त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आणि त्यांचा कार्यकाळ १० डिसेंबर २०१४ रोजी संपला होता. त्यानंतर त्यांची ही नियुक्ती करण्यात आली.



मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधानांचे प्रधान सचिव-२ म्हणून श्री शक्तिकांता दास, आयएएस (निवृत्त) (तामिळनाडू:१९८०) यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. ही नियुक्ती त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून प्रभावी होईल. त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेशापर्यंत, जे आधी असेल ते संपणार आहे.


दास यांच्या नियुक्तीनंतर राजकीय आणि आर्थिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख असल्यामुळे या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी