Disha Salian death case : आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अटक माझ्यामुळे टळली!

आता कोणत्याही क्षणी होणार आदित्य ठाकरेंना अटक; ठाकरे गटातील माजी नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) अटक होऊ नये म्हणून मी त्यावेळी माझ्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच आदित्य ठाकरेंची अटक टळली, अन्यथा त्यांना आधीच अटक झाली असती, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


किशोर तिवारी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत सांगितले की, "पंतप्रधान मोदींना जेव्हा वाटेल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल." तसेच, आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असताना दिशा सालियन हिच्या घरी जाऊन पार्टी केल्याचा आणि त्यानंतर दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिवारी यांनी केला आहे.



तिवारी यांनी पुढे सांगितले की, आदित्य ठाकरेंची अटक होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच त्यांची अटक टळली. तिवारी हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.



दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्यापासून या प्रकरणावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. काहींनी तिच्या आत्महत्येमागे कट असल्याचा आरोप केला होता. आता किशोर तिवारी यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची