Disha Salian death case : आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अटक माझ्यामुळे टळली!

आता कोणत्याही क्षणी होणार आदित्य ठाकरेंना अटक; ठाकरे गटातील माजी नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) अटक होऊ नये म्हणून मी त्यावेळी माझ्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच आदित्य ठाकरेंची अटक टळली, अन्यथा त्यांना आधीच अटक झाली असती, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


किशोर तिवारी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत सांगितले की, "पंतप्रधान मोदींना जेव्हा वाटेल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल." तसेच, आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असताना दिशा सालियन हिच्या घरी जाऊन पार्टी केल्याचा आणि त्यानंतर दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिवारी यांनी केला आहे.



तिवारी यांनी पुढे सांगितले की, आदित्य ठाकरेंची अटक होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच त्यांची अटक टळली. तिवारी हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.



दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्यापासून या प्रकरणावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. काहींनी तिच्या आत्महत्येमागे कट असल्याचा आरोप केला होता. आता किशोर तिवारी यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू