Anganewadi Yatra 2025 : आंगणेवाडीत उसळणार जनसागर!

अंगणेवाडी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा जत्रोत्सव शनिवारी होत आहे. जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. गेले महिनाभर चाललेली या जत्रोत्सवासाठीची तयारी पूर्णत्वास गेली असून समस्त आंगणे कुटुंबीय आई भराडी मातेच्या जत्रोत्सवास येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतास उत्सुक झाले आहेत.



नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रूप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, विविध पक्षांचे राजकीय नेते, खासदार, आमदार, माजी महापौर येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुमारे आठ लाख भाविक जत्रोत्सवास उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवस जत्रोत्सव


श्री देवी भराडी मातेच्या आशीर्वादाने आंगणे कुटुंबीयांनी यात्रेकरूंसाठी शनिवारी होणाऱ्या जत्रोत्सवाचा कालावधी वाढवून दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत केला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे. जत्रोत्सव दोन दिवसांचा असणार आहे. जत्रोत्सवानिमित देवालयात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका