Pandharpur : पंढरपूर येथील १२९ कोटीच्या दर्शन मंडपाच्या टेंडरला 'खो'

सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्कायवॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी, यासाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांतून दर्शन मंडप आणि स्कायवॉकचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी तांत्रिक बाबींचा मुद्दा समोर आणण्यात आला आहे.



तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्कायवॉकसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्याआधी जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून २३ सप्टेंबरला मंजुरी मिळाली होती. याबाबत शासन आदेश जारी होऊन स्कायवॉकसाठी टेंडर मागविण्यात आले. त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रियेतील कालावधी कमी केला होता. पुन्हा तांत्रिक मुद्दा समोर आणून दर्शन मंडपाच्या कामाची प्रक्रिया थांबविल्याने भाविकांमधून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन