Zakir Hussain : उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफिली पुन्हा अनुभवण्याची संधी!

  38

मुंबई : पृथ्वी थिएटर आणि तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे घट्ट ऋणानुबंध जोडले गेले होते. दरवर्षी २८ फेब्रुवारीला उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) पृथ्वी थिएटरमध्ये कार्यक्रम करत असत. मात्र गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले आणि ही परंपरा खंडित झाली. यावर्षी उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये आजवर रंगलेल्या मैफिली ध्वनीचित्रफितींद्वारे रसिकांना पुन्हा अनुभवता येणार आहेत. ‘गुजिश्ता यादें’ या नावाने होणाऱ्या कार्यक्रमांतर्गत या ध्वनीचित्रफितींद्वारे उस्ताद झाकीर हुसैन यांनी गेल्या वीस वर्षात पृथ्वी थिएटरमध्ये केलेले कार्यक्रम दाखवण्यात येणार आहेत.



पृथ्वी थिएटरच्या संस्थापक जेनिफर केंडल यांचे १९८४ मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांच्या जन्मदिनी २८ फेब्रुवारीला पृथ्वी थिएटरमध्ये उस्ताद झाकीर हुसैन आपला कार्यक्रम सादर करत असत. पहिल्या वर्षी त्यांनी जेनिफर केंडल यांना कार्यक्रम समर्पित केला होता.


२१ आणि २२ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता आणि रात्री ८ वाजता ध्वनीचित्रफीत दाखवली जाईल. तर २३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता, सायंकाळी ५ वाजता आणि रात्री ८ वाजता तीन वेगवेगळ्या ध्वनीचित्रफिती पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वाने पृथ्वी थिएटर येथे ‘गुजिश्ता यादें’ नावाने उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफिली रसिकांना अनुभवायला मिळतील. (Zakir Hussain)

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.