Pune News : पुण्यात इलॉन मस्कची एन्ट्री; टेस्ला कंपनीचा प्लांट उभारणार

पुणे  : इलॉन मस्कची टेस्ला कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्लांट उभारण्यासाठी जमीन शोधत असून, लवकरच टेस्ला कंपनी महाराष्ट्रात प्लांट उभारण्याची शक्यता आहे. या संदर्भात टेस्लाने राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही सुरू केली आहे. इलॉन मस्क यांच्या अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्र हा टेस्लाचा पसंतीचा पर्याय का ठरला आहे, यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.



पुण्यात टेस्लाचे आधीपासून कार्यालय आहे आणि त्यांचे अनेक पुरवठादार देखील महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यामुळे टेस्लासाठी महाराष्ट्र हा व्यवसाय विस्तारासाठी नैसर्गिक पर्याय आहे. महाराष्ट्र सरकारने पुण्याच्या जवळ असलेल्या चाकण आणि चिखली येथे जमीन देण्याची ऑफर दिली असल्याचे अधिकाऱ्यांकडून खासगीत सांगण्यात आले. चाकण हे वाहननिर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. येथे मर्सिडीज-बेंझ, टाटा मोटर्स, महिंद्रा अॅन्ड महिंद्रा, फोक्सवॅगन आणि बजाज ऑटो यांसारख्या मोठ्या कंपन्या आहेत. महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे की, चर्चा अद्याप सुरू आहे. कोणत्याही अंतिम करारावर स्वाक्षरी झालेली नाही.


टेस्ला आपल्या निर्णय घेण्यापूर्वी बंदराच्या जवळच्या जमिनीचा विचार करत आहे. इलॉन मस्क आणि मोदी यांची भेट झाल्यानंतर लगेच टेस्लाने लिंक्डइनवर भारतासाठी १३३ पदांसाठी भरती सुरू केली आहे. ही पदे मुंबई आणि दिल्लीमध्ये आहेत. टेस्ला भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यापूर्वी विक्री शो-रूम सुरू करण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये