INS Guldar : विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आयएनएस गुलदार युद्धनौका

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गवासियांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याची घोषणा केली आहे. ही नौका सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे.




सिंधुदुर्गात वसलेल्या विजयदुर्ग बंदरात आयएनएस गुलदार ही युद्धनौका दाखल होणार आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे मंत्री नितेश राणे यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.



भारतीय नौदलाचे आयएनएस गुलजार हे केवळ युद्धनौका नसून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल, ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढेल. विशेष म्हणजे ही नौका सर्वसामान्यांसाठी देखील खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

कोकणाच्या विकासासाठी भाजपचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; जयगड बंदर बनणार अर्थव्यवस्थेचं केंद्र

रत्नागिरी: मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते नितेश राणे

रत्नागिरी नाचणेत मुलाकडून आईचा खून, खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

गणेशोत्सवाच्या उत्साहात रत्नागिरी जिल्हा हादरला आहे. शहरातील नाचणे येथे पोटच्या मुलाने आपल्या आईचा निर्घृण

खेडमधील खवटी गावाजवळ खासगी बस आणि कारचा भीषण अपघात, तिघेजण गंभीर जखमी

खेडमधील खवटी गावाजवळ मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या

वैभव खेडेकरांची मनसेतून हकालपट्टी, वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर, मनसेतून 4 जणांची हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर यांच्या नावाची चर्चा सुरु होती, वैभव खेडेकर भाजपमध्ये जातील अशीही शक्यता

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत ‘आरटीओ’कडून दर सूची प्रसिद्ध

रत्नागिरीत खासगी बस आणि रिक्षा भाड्याबाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दरतक्ता प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात