ठाणे जिल्हापरिषदेच्या शिक्षक पदोन्नतीमध्ये दिव्यांगांवर अन्याय

Share

शहापूर (वार्ताहर) : दिव्यांग शिक्षकांना डावलून इतर शिक्षकांची पदोन्नती करण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्हापरिषदेत झाल्याचे समोर आले आहे. दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रथम पदोन्नती देण्याबाबत उच्च न्यायालयाचे तसेच शासनाचे आदेश असताना ठाणे जिल्हा परिषदेने धिसाढघाई करीत इतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन दिव्यांगांना डावलल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दिव्यांगांना डावलून इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आल्याने यामागे नेमके काय गौडबंगाल आहे या चर्चेला उधाण आले असून जिल्हापरिषदेच्या या पदोन्नती प्रक्रियेने संतप्त झालेले दिव्यांग कर्मचारी न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी ठाणे जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती करण्यात आल्या. ठाणे जिल्हा परिषदेतील पदोन्नती करताना प्रथम दिव्यांग कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी व नंतर इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी असे उच्च न्यायालय व शासनाचे आदेश आहेत. असे असताना दिव्यांग पदे राखीव ठेवून इतर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेने केला आहे. पदोन्नती बाबत दिव्यांग संघटनेने ३१ डिसेंबर २०२४ ला लक्ष वेधल्यानंतर ठाणे जिल्हापरिषदेने दिव्यांगांसाठी आरक्षित पदांवर सेवाजेष्ठतेनुसार पात्र दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी दिव्यांग पदांची सुनिश्चिती होण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे विनंती केली होती. मात्र याबाबत प्रधान सचिवांच्या उत्तराची वाट न पाहता ठाणे जिल्हापरिषदेने दिव्यांगांना डावलून धीसाडघाई करीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील ५२ शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. दिव्यांगांना डावलल्याने या पदोन्नतीमुळे दिव्यांगांवर अन्याय झाला असून तीव्र असंतोष पसरला आहे. याबाबत चौकशी व्हावी अशी मागणीही केली जात आहे.

या प्रक्रियेत सुदृढ कर्मचाऱ्यांना जवळच्या शाळांवर नियुक्ती होइल व दिव्यांग कर्मचाऱ्यांची पदे राखीव ठेवून त्यांची दूरच्या शाळांवर नियुक्ती होईल किंवा यानंतर ही प्रक्रिया काही कारणास्तव लांबणीवर गेल्यास दिव्यांग कर्मचारी सेवानिवृत्त होतील मात्र त्यांना पदोन्नती मिळणार नाही हा अन्याय आहे. त्यामुळे पदोन्नती प्रक्रिया रद्द करून दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे ठाणे जिल्हा दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश राऊत व सचिव नितीन पाटोळे
यांनी सांगितले.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

20 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

59 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago