महाकुंभातील पवित्र स्नानासाठी केली शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. या १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शनिवार १५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे. याच महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी वडील आणि मुलगी शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा करुन आले. संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर त्यांना सायकल यात्रेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.



सायकलवरुन आलेले वडील आणि मुलगी दिल्लीच्या ज्या भागात वास्तव्यास आहेत तिथून प्रयागराज पर्यंतचे अंतर ६७५ किमी. आहे. हा प्रवास वडील आणि मुलगी यांनी सायकलवरुन केला. रेल्वे आणि बसला असलेली गर्दी तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीत अडकण्याचा धोका ओळखून दोघांनी सायकलवरुन संगमावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. अनुपमा पंत आणि तिचे वडील उमेश पंत यांनी सायकल प्रवास नकळत नव्या विक्रमाची नोंद केली.



सायकलचा प्रवास आरोग्यासाठी उत्तम आहे. शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, असे अनुपमा आणि तिचे वडील उमेश यांनी सांगितले. सायकल यात्रेमुळे नियोजन करुन प्रयागराजला पोहोचणे शक्य झाले असेही ते म्हणाले. दोघांनी नागरिकांना सायकलद्वारे जास्तीत जास्त प्रवास करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च