महाकुंभातील पवित्र स्नानासाठी केली शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. या १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शनिवार १५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे. याच महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी वडील आणि मुलगी शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा करुन आले. संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर त्यांना सायकल यात्रेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.



सायकलवरुन आलेले वडील आणि मुलगी दिल्लीच्या ज्या भागात वास्तव्यास आहेत तिथून प्रयागराज पर्यंतचे अंतर ६७५ किमी. आहे. हा प्रवास वडील आणि मुलगी यांनी सायकलवरुन केला. रेल्वे आणि बसला असलेली गर्दी तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीत अडकण्याचा धोका ओळखून दोघांनी सायकलवरुन संगमावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. अनुपमा पंत आणि तिचे वडील उमेश पंत यांनी सायकल प्रवास नकळत नव्या विक्रमाची नोंद केली.



सायकलचा प्रवास आरोग्यासाठी उत्तम आहे. शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, असे अनुपमा आणि तिचे वडील उमेश यांनी सांगितले. सायकल यात्रेमुळे नियोजन करुन प्रयागराजला पोहोचणे शक्य झाले असेही ते म्हणाले. दोघांनी नागरिकांना सायकलद्वारे जास्तीत जास्त प्रवास करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव