महाकुंभातील पवित्र स्नानासाठी केली शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. या १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शनिवार १५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे. याच महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी वडील आणि मुलगी शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा करुन आले. संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर त्यांना सायकल यात्रेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.



सायकलवरुन आलेले वडील आणि मुलगी दिल्लीच्या ज्या भागात वास्तव्यास आहेत तिथून प्रयागराज पर्यंतचे अंतर ६७५ किमी. आहे. हा प्रवास वडील आणि मुलगी यांनी सायकलवरुन केला. रेल्वे आणि बसला असलेली गर्दी तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीत अडकण्याचा धोका ओळखून दोघांनी सायकलवरुन संगमावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. अनुपमा पंत आणि तिचे वडील उमेश पंत यांनी सायकल प्रवास नकळत नव्या विक्रमाची नोंद केली.



सायकलचा प्रवास आरोग्यासाठी उत्तम आहे. शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, असे अनुपमा आणि तिचे वडील उमेश यांनी सांगितले. सायकल यात्रेमुळे नियोजन करुन प्रयागराजला पोहोचणे शक्य झाले असेही ते म्हणाले. दोघांनी नागरिकांना सायकलद्वारे जास्तीत जास्त प्रवास करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच