महाकुंभातील पवित्र स्नानासाठी केली शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा

  69

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभमेळा सुरू आहे. या १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात शनिवार १५ फेब्रुवारीपर्यंत ५१.४७ कोटींहून अधिक लोकांनी पवित्र स्नान केले, या संदर्भातील माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे. याच महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी वडील आणि मुलगी शेकडो किलोमीटरची सायकल यात्रा करुन आले. संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर त्यांना सायकल यात्रेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.



सायकलवरुन आलेले वडील आणि मुलगी दिल्लीच्या ज्या भागात वास्तव्यास आहेत तिथून प्रयागराज पर्यंतचे अंतर ६७५ किमी. आहे. हा प्रवास वडील आणि मुलगी यांनी सायकलवरुन केला. रेल्वे आणि बसला असलेली गर्दी तसेच ठिकठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीत अडकण्याचा धोका ओळखून दोघांनी सायकलवरुन संगमावर पोहोचण्याचा निर्णय घेतला. अनुपमा पंत आणि तिचे वडील उमेश पंत यांनी सायकल प्रवास नकळत नव्या विक्रमाची नोंद केली.



सायकलचा प्रवास आरोग्यासाठी उत्तम आहे. शिवाय वाहतूक कोंडीच्या समस्येवर एक प्रभावी उपाय आहे, असे अनुपमा आणि तिचे वडील उमेश यांनी सांगितले. सायकल यात्रेमुळे नियोजन करुन प्रयागराजला पोहोचणे शक्य झाले असेही ते म्हणाले. दोघांनी नागरिकांना सायकलद्वारे जास्तीत जास्त प्रवास करण्याचे आवाहन केले.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या