Ambernath Temple : अंबरनाथचे शिवमंदिर जागतिक पातळीवर झळकणार!

Share

उल्हासनगर : उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहेत. शनिवारी अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांची पाहणी करताना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. धार्मिक स्थळांचे संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधांचा विकास, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे रूप पालटणार असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. (Ambernath Temple)

अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी १४० कोटींचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा उद्देश असून, काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा संपूर्ण विकास काळ्या पाषाणात होणार आहे. भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. मंदिरासमोरील चौकात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, वाहनतळ, भक्तनिवास आणि प्रदर्शन केंद्राची उभारणीदेखील करण्यात येणार आहे. तसेच प्राचीन कुंडाचे जतन आणि घाटाची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, वाराणसीप्रमाणेच या ठिकाणी भाविकांना घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्णत्वास आले असून, घाट उभारणीला वेग आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या कायापालट होणार आहे. (Ambernath Temple)

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago