Ambernath Temple : अंबरनाथचे शिवमंदिर जागतिक पातळीवर झळकणार!

  56

उल्हासनगर : उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहेत. शनिवारी अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांची पाहणी करताना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. धार्मिक स्थळांचे संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधांचा विकास, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे रूप पालटणार असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. (Ambernath Temple)



अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी १४० कोटींचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा उद्देश असून, काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा संपूर्ण विकास काळ्या पाषाणात होणार आहे. भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. मंदिरासमोरील चौकात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, वाहनतळ, भक्तनिवास आणि प्रदर्शन केंद्राची उभारणीदेखील करण्यात येणार आहे. तसेच प्राचीन कुंडाचे जतन आणि घाटाची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे, वाराणसीप्रमाणेच या ठिकाणी भाविकांना घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्णत्वास आले असून, घाट उभारणीला वेग आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या कायापालट होणार आहे. (Ambernath Temple)

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची