Ambernath Temple : अंबरनाथचे शिवमंदिर जागतिक पातळीवर झळकणार!

उल्हासनगर : उल्हासनगर अंबरनाथ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश खा. डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी दिले आहेत. शनिवारी अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांची पाहणी करताना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. धार्मिक स्थळांचे संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडा सुविधांचा विकास, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा यावर भर देण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे अंबरनाथ शहराचे रूप पालटणार असून नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. (Ambernath Temple)



अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या सुमारे ९०० वर्षांहून अधिक प्राचीन शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी १४० कोटींचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे मंदिराला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, हा उद्देश असून, काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसराचा संपूर्ण विकास काळ्या पाषाणात होणार आहे. भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. मंदिरासमोरील चौकात नंदीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, वाहनतळ, भक्तनिवास आणि प्रदर्शन केंद्राची उभारणीदेखील करण्यात येणार आहे. तसेच प्राचीन कुंडाचे जतन आणि घाटाची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे, वाराणसीप्रमाणेच या ठिकाणी भाविकांना घाट आरतीचा अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडाचे काम पूर्णत्वास आले असून, घाट उभारणीला वेग आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या कायापालट होणार आहे. (Ambernath Temple)

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध