अलिबागच्या शिक्षकाची अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या

वाशी : अलिबागमधील कुर्डुस नावाच्या गावात राहणाऱ्या वैभव पिंगळे या ४५ वर्षांच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अर्थात शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी घडली. सेक्सटॉर्शनला वैतागून वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वैभव पिंगळे हे क्रेटा कारने अटल सेतूवर आले. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. नंतर पुलावरुन समुद्रात उडी मारली. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने सेतूवर एक कार थांबली असल्याचे पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस पोहचण्याआधीच वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केली होती.



मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी वैभव पिंगळेंना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले होते. पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. या प्रकाराला वैतागलेले वैभव पिंगळे प्रचंड मानसिक ताणाखाली होते. त्यांनी पोलिसांची मदत घेण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे प्राथमिक तपासातून समजले आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. उलवे पोलीस तपास करत आहेत.

याआधी २०२४ मध्ये अटल सेतूवरुन आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. सावध असलेल्या पोलिसांनी उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला ताब्यात घेतले होते.
Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह