दोषी नाही तर कारवाई नाही म्हणत अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पाठिंबा!

मुंबई : धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली असून दोषी नाही तर कारवाई नाही, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.



धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी देवगिरीत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी सुरेश धस यांनी अजित पवारांच्या भेटीची मागणी केली होती, मात्र अजित पवारांनी ही भेट नाकारली होती. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, पुरावे जोपर्यंत नाहीत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीय.



गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे आर्थिक हितसंबंध, कृषीघोटाळ्यावरून आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजिनामा घ्यावा असा दबाव वाढत असताना दुसरीकडे करुणा मुंडेंनी ओढलेले ताशेरे आणि वारंवार होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. या अनुषंगाने गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चदरम्यान धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.



एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव विरोधकांनी वाढवला आहे. दरम्यान, करुणा मुंडेंची असलेली न्यायालयीन लढाई पाहता धनंजय मुंडेंवर वारंवार ताशेरे ओढले जात असल्याने पक्षाची प्रचंड बदनामी होत असल्याने गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. साधारणपणे दोन तास चाललेल्या या बैठकीत जोपर्यंत धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कारवाईची भूमिका घेणार नाही हाच सूर नेत्यांचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोप प्रत्यारोप तर दुसरीकडे कृषी घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कृषी घोटाळ्याचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई नको अशीच भूमिका नेत्यांनी घेतल्याचं समोर येत आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही