दोषी नाही तर कारवाई नाही म्हणत अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना पाठिंबा!

मुंबई : धनंजय मुंडेंवरचे आरोप जोपर्यंत सिद्ध होणार नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली असून दोषी नाही तर कारवाई नाही, असं म्हणत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.



धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी देवगिरीत झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी सुरेश धस यांनी अजित पवारांच्या भेटीची मागणी केली होती, मात्र अजित पवारांनी ही भेट नाकारली होती. दरम्यान, देवगिरी बंगल्यावर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांसोबत झालेल्या अनौपचारिक बैठकीत अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, पुरावे जोपर्यंत नाहीत तोपर्यंत पक्ष कारवाई करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीय.



गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडेंवर संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराडशी असणारे आर्थिक हितसंबंध, कृषीघोटाळ्यावरून आरोप होत आहेत. धनंजय मुंडेंचा राजिनामा घ्यावा असा दबाव वाढत असताना दुसरीकडे करुणा मुंडेंनी ओढलेले ताशेरे आणि वारंवार होणा-या आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत आहे. या अनुषंगाने गुरुवारी रात्री देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोन तास चर्चा केली. या चर्चदरम्यान धनंजय मुंडेंवरील आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कोणतीही कारवाई करणार नसल्याची भूमिका घेत पुन्हा एकदा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.



एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव विरोधकांनी वाढवला आहे. दरम्यान, करुणा मुंडेंची असलेली न्यायालयीन लढाई पाहता धनंजय मुंडेंवर वारंवार ताशेरे ओढले जात असल्याने पक्षाची प्रचंड बदनामी होत असल्याने गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा नेत्यांची बैठक पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. साधारणपणे दोन तास चाललेल्या या बैठकीत जोपर्यंत धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत पक्ष कारवाईची भूमिका घेणार नाही हाच सूर नेत्यांचा होता अशी माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोप प्रत्यारोप तर दुसरीकडे कृषी घोटाळ्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कृषी घोटाळ्याचा अहवाल येईपर्यंत कोणतीही कारवाई नको अशीच भूमिका नेत्यांनी घेतल्याचं समोर येत आहे.
Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक