Shirdi News : पुढील चार दिवस रात्री अकरा नंतर शिर्डी बंद!

नाशिक : दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहराची सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्थेसंबंधी निर्णय घेण्यात येणार असून याच पार्श्ववभूमीवर पुढील चार दिवस रात्री अकरा नंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. वाढती गुन्हेगारी लक्षात घेता त्यावर उपाययोजना आखण्यात येणार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांनंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एक स्थायी पथक शिर्डीत नियुक्त करण्यात आले आहे. आठ जणांचे हे पथक येथील गुन्हेगार आणि त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवून राहणार आहे. तसेच शिर्डीत राहणाऱ्यांचे आधार, रेशनकार्ड यांची चौकशी नगरपालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शिर्डी शहरात पोलिसांच्या रेकॉर्डवर लहानमोठे ११४ तर १२ सराईत गुन्हेगार आहेत. यातील १३ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे; तर १३ जणांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. अन्य जिल्ह्यांतून तडीपार केल्या जाणाऱ्या गुन्हेगारांना यापुढे शिर्डीत आश्रय देऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.



डॉ. विखे काय म्हणाले ?


डॉ. विखे म्हणाले ‘रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहणार असल्याची सूचना पुढील चार दिवस गावात दवंडी देऊन दिली जाईल. त्यानंतर या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाईल. रात्री साडेअकरा वाजता सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय ग्रामसभेत झाला आहे. शिर्डीत राहणाऱ्यांचे आधार, रेशनकार्ड यांची चौकशी नगरपालिकेकडून करून घेण्यात येणार आहे. यात काही चुकीचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. साईप्रसादालयातील भोजनावरून आपल्यावर टीका झाली. मात्र, यासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे शिर्डी बाहेरच्या लोकांची टीका आणि सल्लेही ऐकून घेतले जाणार नाहीत. येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आणि गरजेनुसार निर्णय घेतले जातील,’ असेही विखे म्हणाले.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या