Mumbai News : नागपूर-सिकंदराबाद-वंदे भारत एक्स्प्रेस आता आठ डब्यांसह चालणार

मुंबई  : बुधवार १९ फेब्रुवारी पासून गाडी क्रमांक २०१०१/२०१०२ नागपूर-सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांऐवजी ८ डब्यांसह चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंत नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ३३.८१% आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा सरासरी प्रवास दर हा ३३.८७% आहे. डब्यांच्या संख्येत कपात केल्याने सेवा कार्यक्षमता वाढेल,गाडीची वेळ सुधारेल आणि उच्च-तंत्रज्ञानाच्या रोलिंग स्टॉकचा योग्य वापर होईल, तसेच प्रवाशांना प्रीमियम वंदे भारतचा अनुभव मिळेल.



हा उपक्रम प्रवर्तन आणि संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेशी सुसंगत असून ज्यामुळे गरजेनुसार आणि वापरानुसार आधुनिक तंत्रज्ञान प्रवाशांना मिळेल असा विश्वास रेल्वेला आहे . या बदलामुळे सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही आणि प्रवाशांना जलद प्रवास, सुधारित आराम आणि अत्याधुनिक ऑनबोर्ड सुविधांसह जागतिक दर्जाच्या सुविधांचा आनंद
घेता येईल.

Comments
Add Comment

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल

Kanjurmarg Station Footpath : कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरासह एलबीएसचा मार्गाच्या पदपथ होणार मोकळ्या

तब्बल या परिसरातील १००हून अधिक गाळ्यांवर होणार कारवाई मुंबई विशेष प्रतिनिधी : कांजूरमार्ग रेल्वेथ स्थानक

Cooper Hospital Mumbai : कुपर रुग्णालयात येत्या मार्च पर्यंत मिळणार एमआयसीयू सुविधा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात सध्या १०

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी