मुंबईतील खाऊगल्लीने पादचाऱ्यांचा अडवला रस्ता

  71

पायवाटेवर टेबल्स टाकून दिली जाते सर्विस


मुंबई : दक्षिण मुंबईतील फॅशन स्टिट येथील खाऊगल्लीतील वाढत्या खवष्यांच्या गर्दीमुळे येथील रस्ताच आता अडवला जात आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवताना स्टॉल्स धारकांकडून रस्ता अडवून बसण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत या खाऊगल्लीतून पादचाऱ्यांना चालण्यासही जागा उरत नसून खाऊगल्लीने आता रस्ताही अडवून टाकल्याने पादचाऱ्यांनी चालायचे कुठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


चर्चगेट येथील फॅशन स्टिटच्या मागील बाजूस असलेल्या खाऊ गल्लीतील खवय्यांची गर्दी आता वाढत चालली असून प्रत्येक स्टॉल्सधारकांकडून आपल्या समोरील जागेत तीन ते चार टेबल्स लावली जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजुला असलेल्या स्टॉल्सधारकांकडून प्रत्येकी आठ ते दहा फुटांची जागा अडवली जात असल्याने संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा अडथळा पार करत रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. आझाद मैदानातून फॅशन स्टीट येथील पायवाटेने खाऊ गल्लीतून चर्चगेट रेल्वे स्थानक गाठले जाते. परंतु संध्याकाळी नेहमीची लोकल पकडण्यासाठी घाईगडबडीत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या खाऊगल्लीतील गर्दीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


हे स्टॉल्स अधिकृत असले तरी त्यासमोरील जागा ते अडवू शकत नाही. परंतु एवढ्या जागा अडवल्या जात असतानाही महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील पायवाटेच्या जागेवर खुच्र्ष्या टाकून ती जागा अडवण्याचे प्रकार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.