‘वक्फ’वरील जेपीसीच्या अहवालावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील गुरुवारी शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) अहवाल राज्यसभेत सादर करण्यात आला. अहवाल सादर झाल्यानंतर सदस्यांनी गोंधळ घातला. लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतर गोंधळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.



अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी, वक्फ दुरुस्ती विधेयकावरील जेपीसी अहवालाच्या सादरीकरणावरून संसदेत गदारोळ झाला. ते राज्यसभेत भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडले, तर लोकसभेत ते जेपीसी अध्यक्ष व भाजपा खासदार जगदंबिका पाल यांनी मांडले. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेसने संसदेच्या परिसरात निदर्शनेही केली. केरळमधील किनारी व वन सीमावर्ती समुदायांच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी संसद भवन संकुलात फलक व बॅनर घेऊन निषेध केला. केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, वायनाडमध्ये वन्य प्राण्यांनी सात जणांचा बळी घेतला आहे. ही समस्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने निधी पाठवण्याची गरज आहे.



गदारोळातच राज्यसभेमध्ये अहवाल सादर



राज्यसभेत वक्फ विधेयकाबाबतच्या जेपीसी अहवालावर टीएमसी खासदार सुष्मिता देव म्हणाल्या, जर तुम्ही पाहिले तर, त्यांनी सादर झालेल्या समितीच्या अहवालावरील असहमतीची नोंद काळ्या शाईने किंवा पांढऱ्या कागदाने अधोरेखित केली आहे. जर आपण या देशाला लोकशाही मानतो, तर प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असले पाहिजे. तुम्ही आमचे मत कसे लपवू शकता? आम्ही राज्यसभेत त्याचा विरोध केलाय. विधेयकावर आक्षेप व्यक्त करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, हे विधेयक योग्य नाही. हा एक बनावट अहवाल आहे. आम्ही हे स्वीकारणार नाही. खासदारांची मते दाबली गेली आहेत. खरगे म्हणाले की, हा अहवाल पुन्हा एकदा जेपीसीकडे पाठवावा. जे. पी. नड्डा यांनी हे पाऊल उचलले पाहिजे. आमच्या मतभेदांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे खरगे म्हणाले.
Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन