Palghar News : सांडपाण्यामुळे जलप्रदूषण, शहरातील मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील सांडपाण्याबर प्रक्रिया करणारे मलनिस्सारण केंद्र हे संथ गतीने काम करत आहेत. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या कायम आहे. त्यासाठी या केंद्राचे शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रायोगिक मर्यादित ) संस्थेमार्फत लेखा परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.


मीरा-भाईंदर शहरात विविध ठिकाणी एकूण १९ मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) आहेत. हे केंद्र जवळपास पंधरा वर्षांपूर्वी उभे करण्यात आले आहेत. मात्र शहरात भूमिगत गटार योजनेचे काम बऱ्याच वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे हे केंद्र अपेक्षेप्रमाणे कार्यरत नाही. परिणामी अनेकवेळा दूषित पाणी प्रक्रियाविनाच खाडी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे पाणी प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याचे आरोप पालिकेवर सातत्याने करण्यात येत आहेत.



या पार्श्वभूमीवर शहरातील मलनिस्सारण केंद्राचे ‘लेखापरीक्षण’ करून घेण्याचा निर्णय आयुक्त संजय काटकर यांनी घेतला आहे. यात समोर येणाऱ्या त्रुटींवर काम करून हे केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्याकडे प्रशासनाचे लक्ष असल्याचा दावा काटकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महाप्रीत संस्थेला मलनिस्सारण केंद्राचे लेखापरीक्षण करणे, विजेची बचत करण्याच्या दुष्टीने उपाययोजना सूचवणे तसेच प्रकल्प कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ज्ञान भागीदार आणि निधी उपलब्ध करून देण्याचे काम सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मराठा तरुणांच्या उद्योग उभारणीला फडणवीस सरकारकडून बळ

अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी १५० कोटींचा निधी वितरित मुंबई : फडणवीस सरकारने मराठा समाजातील तरुण उद्योजकांना

Pakistan News : पाकिस्तानात दोन गटांमध्ये भीषण चकमक; १४ जण ठार, टीटीपी कमांडरचाही खात्मा

पाकिस्तान : पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी दोन सशस्त्र गटांमध्ये भीषण चकमक

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक; मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  रस्त्यावर राहणाऱ्या, अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ पथदर्शी योजना सहा

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार