वसई तालुक्यात दोन लाख शिधा लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित

वसई  : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वसईतील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्यात येत आहे. अजूनही तालुक्यातील २ लाख ९ हजार ८७८ शिधालाभार्थ्यांचे ई केवायसी प्रलंबित असून त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात
आली आहे.


अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. या धान्याचे वितरण पारदर्शक रित्या होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने त्याचे वितरण १८० शिधावाटप केंद्रावर सुरू आहे. वसईत सुमारे १ लाख ४५ हजार ९०६ इतके प्राधान्य कुटुंब लाभार्थी व ३ हजार ८०६ अंत्योदय शिधापत्रिका धारक असून त्यांचे एकूण ५ लाख ९८ हजार ७० इतके शिधा लाभार्थी आहेत.



पीओएस यंत्रात आधार प्रमाणीकरण न करण्यात आल्याने अनेक शिधा लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास अडचणी येत होत्या. आता सर्वच शिधा लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याचे काम ही शिधा वाटप केंद्रावर सुरू होते.


मात्र काही शिधा लाभार्थी ई-केवायसी करण्यास पुढे येत नसल्याने ते ई-केवायसी पासून प्रलंबित राहू लागले आहे. आतापर्यंत वसईत ५ लाख ९८ हजार ७० शिधा लाभार्थ्यांपैकी ३ लाख ८८ हजार १९२ लाभार्थ्यांचे ई-केवायसी झाले आहे. तर अजूनही २ लाख ९ हजार ८७८ इतके शिधा लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.


आता शासनाने ई-केवायसी करण्यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत दिली असून प्रलंबित असलेल्या शिधा लाभार्थ्यांना ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे असे आवाहन पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट