RCB ला IPL 2025 साठी मिळाला नवा कर्णधार

बंगळुरू : आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार नाही.





रजत पाटीदार २०२१ पासून आयपीएल खेळत आहे. त्याने २०२१ ते २०२४ या कालावधीत २७ आयपीएल सामने खेळून ७९९ धावा केल्या आहेत. यात नाबाद ११२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने आयपीएलमध्ये एक नाबाद शतक आणि सात अर्धशतके केली आहेत. आयपीएलमधील कारकि‍र्दीत त्याने ५४ षटकार आणि ५१ चौकार मारले आहेत.



स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारा आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारा रजत पाटीदार हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे.

शांत स्वभावाचा रजत पाटीदार हा २०२१ पासून आरसीबीसोबत आहे. कामगिरीच्या जोरावर त्याने संघातील स्वतःचे स्थान बळकट केले आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावाआधी त्याला आरसीबीने रिटेन करण्यासाठी ११ कोटी मोजले होते. रजत पाटीदार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतो. आता झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वात मध्य प्रदेशने फायनल गाठली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ मध्ये दहा सामन्यात ६१.१४ च्या सरासरीने रजतने ४२८ धावा काढल्या होत्या. यामध्ये त्याने ५ अर्धशतके केली होती. त्याने ३१ षटकार आणि ३२ चौकार मारले होते.
Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.

IND vs ENG T20 : पावसाचा खेळ! भारत-इंग्लंड पहिला टी-२० सामना रद्द

डरहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० (T20) सामना मुसळधार पावसामुळे रद्द (Cancelled) करण्यात आला. भारतीय संघाचा (Team