Ind vs Eng: टी-२० नंतर वनडेतही भारताची बाजी, इंग्लंडला दिला व्हाईटवॉश

अहमदाबाद: टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताने इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतही बाजी मारली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला ३-० असा व्हाईटवॉश दिला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता.


या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी ३५७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र इंग्लंडला हे आव्हान गाठता गाठता दमछाक झाली. इंग्लंडच्या संघाला ३४.२ षटकांत केवळ २१४ इतक्याच धावा करता आल्या.भारताने हा सामना तब्बल १४२ धावांनी जिंकला.


लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात धमाकेदार झाली. बेन डकेट आणि फिल सॉल्टने ६.२ षटकांत ६० धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर अर्शदीपने ही भागीदारी तोडली. त्याने दोन्ही खेळाडूंना बाद केले. यानंतर टॉम बँटनने आणि जो रूटने तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा केल्या. कुलदीप यादवने बँटनला बाद करत ही भागीदारीही तोडली. त्यानंतर अक्षऱ पटेलने अनुभवी ज्यो रूटला २४ धावांवर आणि हर्षित राणाने कर्णधार जोस बटलरहा ६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


तत्पूर्वी, टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नव्हती. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने ५१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले तर विराट कोहलीने ५० बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कोहलीच्या वनडे करिअरमधील हे ७३वे अर्धशतक होते.


शुभमन गिलनेही आपल्या करिअरमधील ७वे वेगवान शतक ठोकले. त्याने याआधीच्या दोन सामन्यांमध्येही चांगली खेळी केली होती. फलंदाजांनंतर गोलंदाजीमध्येही भारताने कमाल केली. भारतासाठी अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट घेत चांगली कामगिरी केली.


Comments
Add Comment

India vs Sri Lanka : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार

नवी दिल्ली : भारतीय संघ पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेच्या

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.